<?xml version='1.0' encoding='UTF-8'?><?xml-stylesheet href="http://www.blogger.com/styles/atom.css" type="text/css"?><feed xmlns='http://www.w3.org/2005/Atom' xmlns:openSearch='http://a9.com/-/spec/opensearchrss/1.0/' xmlns:georss='http://www.georss.org/georss' xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'><id>tag:blogger.com,1999:blog-2301518882851474855</id><updated>2012-01-26T05:29:36.056-08:00</updated><title type='text'>आकाशाची अधोरेखितें</title><subtitle type='html'>&lt;p&gt;
मर्ढेकरांच्या एका कवितेतील एक प्रतिमा आठवणींत कायमची रुतून बसलेली होती. ब्लॉगला नाव द्यायची वेळ आली आणि एकदम तीच कशी काय आठवली ते एक बाळ सीतारामच जाणोत !</subtitle><link rel='http://schemas.google.com/g/2005#feed' type='application/atom+xml' href='http://muktasunit.blogspot.com/feeds/posts/default'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2301518882851474855/posts/default?max-results=100'/><link rel='alternate' type='text/html' href='http://muktasunit.blogspot.com/'/><link rel='hub' href='http://pubsubhubbub.appspot.com/'/><author><name>MuktaSunit</name><uri>http://www.blogger.com/profile/00445626723230179642</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://1.bp.blogspot.com/-vZSy_JeY3tg/Ti7ehA38n5I/AAAAAAAAA6U/xfdKbNO0nnk/s220/rajan.jpg'/></author><generator version='7.00' uri='http://www.blogger.com'>Blogger</generator><openSearch:totalResults>16</openSearch:totalResults><openSearch:startIndex>1</openSearch:startIndex><openSearch:itemsPerPage>100</openSearch:itemsPerPage><entry><id>tag:blogger.com,1999:blog-2301518882851474855.post-1089708129022743167</id><published>2011-11-23T10:00:00.000-08:00</published><updated>2012-01-26T05:29:36.089-08:00</updated><title type='text'>२०११ दिवाळी : दिवाळी अंकांचा लेखाजोखा</title><content type='html'>२०११ सालची दिवाळी आली आणि गेली. दिवाळीशी संबंधित उत्सवाइतकंच तिच्या सांस्कृतिक संदर्भाचंही महत्व वेगळं सांगायला नको. फटाके, कपडेलत्ते, फराळ, स्नेहसंमेलनं यांच्या जोडीने रांगोळी , संगीताच्या मैफली आणि अर्थातच दिवाळी अंक हे येणारच. प्रस्तुत लेखात यंदाच्या दिवाळी अंकांबद्दल जी मतेमतांतरे बनत आहेत त्याबद्दल बोलावे असे वाटले म्हणून हा लिखाणाचा प्रपंच.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मराठी आंतरजालावरही दिवाळी अंकांची परंपरा चांगलीच जोम धरते आहे. बहुतेक सर्व सुप्रसिद्ध मराठी स्थळांचे दिवाळी अंक प्रसिद्ध झालेले आहेत. प्रस्तुत लेखात मात्र, अनेक दशकांची परंपरा असलेल्या छापील मराठी दिवाळी अंकांबद्दल थोडं बोलेन म्हणतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;दिवाळी उलटून पंधरा-वीस दिवस झाले तरी पोस्टाने मागवलेले अंक पोचायचं चिन्ह नव्हतं. शेवटी एकदाचे पोचले. आल्याआल्या सर्वच्या सर्व अंक एकामागोमाग एक चाळले. मुखपृष्ठ, आतील मजकूराचं स्वरूप , त्याची छपाई , सजावट , आणि मुख्य म्हणजे एकेका अंकाचा सूरताल समजून घेण्याचा प्रयत्न केला. थोडक्यात , एखादं गुर जसं समोर ठेवलेल्या गवताच्या अनेक भार्‍यांना सुरवातीला चिवडतं आणि मग एकेका भार्‍यातल्या "माला"ला तोंडात भरून नंतर सावकाश रवंथ करतं त्यातला प्रकार.&lt;br /&gt;&lt;br /&gt;अजून सर्वच्या सर्व दिवाळी अंक अथ पासून इतिपर्यंत वाचून व्हायचे आहेत. ही प्रक्रिया पूर्ण व्हायला अनेक आठवडे जावे लागतील. मात्र आतापावेतो काही "फर्स्ट इम्प्रेशन्स" झालेली आहेत. अनेक ठिकाणी निव्वळ चाळायला सुरवात झाली आणि एखादं लिखाण पूर्ण वाचल्याशिवाय थांबता आलं नाही. समग्र वाचन झाल्यानंतर कदाचित संपूर्णत्वाचं कलम भागेल, परंतु , ताज्या ताज्या लिखाणातली मजा जाईल. म्हणून हा लेखाजोखा आताच मांडावा असं वाटलं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;असो. माझ्याकडे खालील अंक आलेले आहेत :&lt;br /&gt;मुक्तशब्द, मौज , अक्षर, प्रहार , चिन्ह , इत्यादि, संपूर्ण अनुवाद , लोकमत-दीपोत्सव , मटा, लोकसत्ता, साप्ताहिक सकाळ , कालनिर्णय , लोकप्रभा, पद्मगंधा , साधना.&lt;br /&gt;&lt;br /&gt;काही निरीक्षणं/मतं मांडतो. विरोधी मतं , अधिक, वेगळी माहिती या सर्वांचं अर्थातच स्वागत आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;अजून खरं म्हणजे असं विधान एकदम करणं धाडसाचं होईल , पण "मुक्तशब्द"च्या प्रेमात मी सध्या आहे आणि मला हा अंक सर्वात अधिक आवडलेला आहे. प्रस्तुत वार्षिक प्रकाशन माझ्या माहितीप्रमाणे गेली पाचेक वर्षेच प्रसिद्ध होतं आहे. या पाच वर्षांत या प्रकाशनाने जमा केलेले लोक , त्यांनी केलेलं लिखाण , त्याची गुणवत्ता , या सार्‍याबद्दल मला अत्यंत आदर वाटतो. मुंबईचे श्री येशू पाटील या अंकाचे सर्वेसर्वा आहेत (संपादकपदीही तेच आहेत. ) सुरवातीला मेघना पेठेंनी यांचं संपादकत्व निभावलं होतं. त्यानंतर मुकुंद कुळे यांनी. आता श्री पाटीलच संपादकाच्या पदावर दिसतात. दर वर्षी कुठलं ना कुठलं "फीचर" हा अंक करतो. गेल्या वर्षी ( की दोन वर्षांमागे ) "प्रत्येक क्षेत्रातले खलनायक" असा विषय होता. त्यावेळी उद्योगक्षेत्रातल्या मुकेश अंबानी पासून ते साहित्यातल्या भालचंद्र नेमाडे यांच्या पर्यंतच्या अनेकांच्या कारकिर्दीवर कठोर प्रहार करणारं लिखाण आलेलं होतं. यंदाची "थीम" होती "विचारतुला" , अर्थात, विचारांची तुलना. विविध क्षेत्रांमधले दोन मान्यवर घेऊन त्यांच्यावर लिहिण्याचा उपक्रम. या फीचरमधल्या लेखाची यादीच देतो म्हणजे त्याच्या वैविद्ध्याची कल्पना येऊ शकेल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"श्रीकृष्ण/जरासंध" - रविंद्र गोडबोले&lt;br /&gt;"ज्ञानेश्वर/चक्रधर" - मुकुंद कुळे&lt;br /&gt;"न्यूटन/लिब्नीझ" - अच्युत गोडबोले&lt;br /&gt;"नेहरू/आंबेडकर " - नामदेव ढसाळ&lt;br /&gt;"पलुस्कर/भातखंडे" - श्रुति सडोलीकर&lt;br /&gt;"भीमसेन/कुमार" - मुकुंद संगोराम&lt;br /&gt;"सॉमरसेट मॉम /गी द मोपासा" रेणु गावस्कर&lt;br /&gt;"इरावती कर्वे/दुर्गा भागवत" - ज्ञानदा देशपांडे&lt;br /&gt;"भालचंद्र नेमाडे/विलास सारंग" - नितीन रिंढे&lt;br /&gt;"जयवंत दळवी/पु ल देशपांडे" - मुकुंद टाकसाळे&lt;br /&gt;"नामदेव ढसाळ/राजा ढाले" - राहुल कोसंबी&lt;br /&gt;"कुमार केतकर/ अरुण टिकेकर" - मुकुंद टाकसाळे&lt;br /&gt;"अंतोनिओनी/बर्गमन" निखिलेश चित्रे&lt;br /&gt;"ग्रेस/महानोर" रणधीर शिंदे&lt;br /&gt;"विजया मेहता/सत्यदेव दुबे" - शफाअत खान&lt;br /&gt;"धीरुभाई अंबानी/नारायण मूर्ती" - नितीन पोतदार&lt;br /&gt;"नसीर/ओम पुरी" - श्रीकांत बोजेवार&lt;br /&gt;"पतौडी/सौरभ गांगुली" - द्वारकानाथ संझगिरी&lt;br /&gt;&lt;br /&gt;याखेरीज मुक्तशब्द हा अंक मला विशेष आवडण्याचं कारण म्हणजे रमेश इंगळे उत्रादकरांसारख्यांच्या कविता, जीके ऐनापुरे , कृष्णात खोत यांच्या सारख्यांच्या कथा, यांचा परिचय या अंकामुळे मला झाला. यंदासुद्धा ही परंपरा चालू आहेच. त्याशिवाय अनुवादित कथांचा वेगळा विभागही यंदा आहे. या सर्वांच्या दर्जाबद्दल दुमत होणे शक्य आहे परंतु हा सर्व , साहित्याच्या क्षेत्रातल्या नव्या लोकांमधल्या उत्तम लोकांपर्यंत पोचण्याचा , त्यांच्या कडून लिहवून घेण्याचा एका गंभीर पातळीवरचा प्रयत्न आहे या बद्दल माझ्या मनात शंका नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;वादग्रस्त होण्याचा धोका स्वीकारून मला हे विधान करावेसे वाटते की, प्रस्तुत घटकेला या अंकाकडे वैचारिक नेतृत्व आल्यासारखे वाटते आहे. पन्नाशीच्या दशकात सत्यकथा आणि मौज प्रकाशनाने ज्या प्रकारे नवीन लोकांना एकत्र आणून नवं घडवण्याचा प्रयत्न केला त्या जातीचं काम चालू आहे असं मला वाटतं. असो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;इतर काही अंकांकडे वळतो. "चिन्ह" या , चित्रकलेला - खरे सांगायचे तर फाईन आर्टस् असं म्हणायला हवं - वाहिलेल्या प्रकाशनाचा बरेच महिने गाजत असलेला अंक या दिवाळीला प्रसिद्ध झालेला आहे. दृष्यकलेमधल्या विचारांना मराठीतून वाव मिळावा, नामवंत लोकांचं काम आणि त्यांचे विचार मराठीतून मांडले जावेत म्हणून श्री. सतीश नाईक हा अंक गेलं दशकभर (की अधिक ?) काढत आहेत. हे प्रकाशन वार्षिक आहे आणि त्यांचा प्रत्येक अंक संग्राह्य असतो. प्रभाकर कोलते , सूझा , आरा , गायतोंडे अशा आंतराष्ट्रीय ख्यातीच्या कलावंतांच्या कामाची ओळख , प्रसंगी प्रदीर्घ मुलाखती आणि प्रत्येक वार्षिक अंकात भरगच्च आर्टप्लेट्स. पाश्चात्य देशात आणि भारतातल्या इंग्रजी माध्यमामधे जो प्रकार मोठ्या प्रमाणावर होतो त्या दर्जाचं काम मराठीतून होणं , ते आपल्याला पहायला मिळ्णं ही एक अत्यंत आनंदाची बाब आहे असं मानतो. "चिन्ह"चा यंदाचा अंक नग्नतेबद्दल आहे आणि या प्रकाराची परंपरा , या प्रकाराचे भारतीय संदर्भ, त्या प्रकाराला जोडून आलेली वादग्रस्तता, हुसैन सारख्यांचा अपरिहार्यपणे येणारा विषय , भारतीय चित्रकारांनी या क्षेत्रांत पूर्वी आणि आता केलेले काम , त्यातल्या नैतिक/सामाजिक/राजकीय गुंतागुंती या सार्‍यांचा उत्तम आर्टप्लेट्स सकट दिलेला एक श्रीमत् अनुभव म्हणजे चिन्ह. चिन्ह बद्दल - किंबहुना मी उल्लेख करत असलेल्या प्रकाशनांपैकी अनेकांबद्दल - स्वतंत्र लेख लिहिणे योग्य होईल. ते जमेल न जमेल म्हणून सध्या इतपत माहिती देतो आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;२०११ चे दिवाळी अंक वाचताना , एकंदरीत अलिकडच्या वर्षांमधल्या दिवाळी अंकांच्या ट्रेंड्स बद्दल विचार करताना काही गोष्टी जाणवल्या.&lt;br /&gt;&lt;br /&gt;अ. ललित वाङ्मयाचा घसरलेला टक्का : एकंदरीत सर्व सुप्रतिष्ठित अंकांवर नजर टाकली असतां हे सहजच कळतं की नॉन-फिक्शन ने ६०, ७०, ८० टक्के - आणि "साधना"सारख्यांच्या संदर्भात बोलायचे तर १०० टक्केसुद्धा - मजकूर व्यापलेला आहे. यातून अनेक शक्यता नोंदवता येतील.&lt;br /&gt;१. दर्जेदार ललितलिखाणाचा अभाव&lt;br /&gt;२. ललित लिखाणाला अलिकडच्या काळात सातत्याने सोसावी लागलेली घसरत्या लोकप्रियतेची झळ&lt;br /&gt;३. एकंदरीतच , माहिती, ज्ञान , इत्यादि गोष्टींचे ललितकृतींवर झालेले वर्चस्व.&lt;br /&gt;&lt;br /&gt;या सर्वांबाबत मला एकट्याला निश्चित मतप्रदर्शन करता येईलच असे नाही. पण "द रायटिंग इज ऑन द वॉल" हे खरं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;ब. छापील माध्यमांनी ऑनलाईन मराठी लिखाणाची अतिशय स्पष्टपणे घेतलेली दखल : छापील आणि ऑनलाईन प्रकाशनांमधल्या लोकांचा एकमेकांच्या सदर्भातला सवतासुभा नवा नाही. छापीलवाले ऑनलाईन वाल्यांकडे गांभीर्याने पाहात नाहीत आणि ऑनलाईनवाल्यांना छापीलवाले सरंजामशाही सारखे , उच्चभ्रू , रटाळ , एकदिशीय वाटतात. यंदा मात्र प्रहार , अक्षर यांच्या सारख्यांनी ऑनलाईन माध्यमाची दखल निश्चित घेतलेली आहे. रामदास आणि चिंतातुर जंतू यांचे ऑनलाईन माध्यमातल्या मराठी लिखाणासंबंधातले लेख प्रहार ने छापलेले आहेत. अक्षरने सुद्धा एक संपूर्ण विभाग या बाबत दिलेला आहे. या लिखाणांमधून ऑनलाईन माध्यमातल्या लोकांच्या शक्तीस्थानांची , या माध्यमाच्या भविष्यकालीन अधिकाधिक मोठ्या सहभागाची नोंद घेतलेली तर आहेच. अभिजित ताम्हाणेंसारख्या ज्येष्ठ पत्रकाराने "अधिक गुणी मराठी ब्लॉग असावेत, अधिकाधिक प्रगल्भ लोकांनी मराठी ब्लॉग लिहावेत अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे". विश्राम गुप्तेंनी आपल्या एका लेखात "ब्लॉगलिखाण म्हणजे निव्वळ बडबड" अशी टिप्पणीही केल्याचं दिसतं आहे. थोडक्यात अजून अढी पूर्ण संपलेली नाही. अनेक दिवाळी अंकांमधल्या लेखाच्या अखेरीस लेखकाचा इमेल पत्ता दिला गेलेला आहे. (एका दिवाळी अंकात फक्त इमेल पत्ताच दिला आहे. बाकी डिटेल्स नाहीतच. )&lt;br /&gt;&lt;br /&gt;क. कलेची गुणवत्ता आणि मार्केटेबिलिटीचा घातला गेलेला मेळ : या संदर्भात वेगवेगळ्या दिवाळी अंकांनी वेगवेगळे मार्ग चोखाळलेत असं म्हणायला हवं. साधनाचा गेल्या वर्षीचा दिवाळी अंक अर्थातच वाचनीय होता. परंतु इतरांपेक्षा बराच जाड असलेल्या या अंकात जाहिराती बेसुमार होत्या. यंदा या अंकाचा साईज जरा नॉर्मल आहे. पण तरी जाहिरातींचा टक्का मोठाच दिसतो. महाराष्ट्र टाईम्स ने वर म्हण्टल्याप्रमाणे , मुखपृष्ठसुद्धा स्पॉन्सर केल्यासारखे दिलेले आहे (त्यात सिरियलचं बॅनर नाही इतकंच ). मार्केटिबिलिटीचा मुद्दा केवळ जाहिरातीपुरता मर्यादित नाही, हा मुद्दा "लोकमत"च्या दिवाळी अंकातून उत्तम रीतीने देता येईल. या अंकाचे अतिथिपद शोभा डेंकडे आहे. त्याच्या मुखपृष्टावर डे बाईंबरोबर अमिताभ बच्चन, करीना कपूर , नीता अंबानी (!) यांच्या सारख्यांच्या नावाची जंत्रीच आहे. संपूर्ण दिवाळी अंक महागड्या ग्लॉसी पेपरवर छापला गेलेला आहे. अर्थात आतमधे उपरोल्लेखित चमकदमकत्या नावांखेरीज रामचंद्र गुहा यांच्या सारख्यांचेही (प्रसंगी अनुवादित) लेख देऊन बॅलन्स साधण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. मेघना ढोके या तरुण पत्रकाराचा  या अंकात प्रदीर्घ लेख आहे आणि एक स्वतंत्र लेख म्हणून तो या अंकातला सर्वात चांगला ठरावा. शोभा डें नी केवळ "मी माहेरला आलेले आहे" अशा स्वरूपाचे मांगल्यवाचक गोऽड टिपण लिहिले आहे इतकाच त्यांचा सहभाग. बाकी बच्चन, अंबानी, कपूर यांचा संपर्क साधून देणे इतकंच काम केलेलं दिसतं. बच्चन , अंबानी , कपूर यांचे "लेख" अर्थातच भाषांतरित तर आहेतच पण ते मूळ लेख सुद्धा त्यांनी "लिहिलेले" नाहीत, शब्दबद्ध केलेले आहेत. या अंकाच्या दहा दहा हजाराच्या चार एडीशन्स खपल्या आहेत असं मला कळलं. किंमत केवळा शंभर रुपये - जी अर्थातच पेपर क्वालिटी लक्षांत घेता अत्यंत कमी आहे. याचा अर्थ सर्व पैसे जाहिरातीतून . ब्रँड च्या मार्केटीबिलिटीचं याहून उत्कृष्ट उदाहरण दिवाळी अंकांच्या संदर्भात मला सापडणं प्रायः अशक्य आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;दिवाळी अंकांबद्दलची प्रस्तुत चर्चा पहिली नाही. इतरांनीही या विषयाबद्दल लिहिलं आहे. प्रस्तुत ब्लॉग एंट्रीचं उदाहरण पहा. हा लेख यंदाच्या दिवाळी आधी आलेला होता.&lt;br /&gt;http://ramjagtap.blogspot.com/2011/09/blog-post_17.html&lt;br /&gt;&lt;br /&gt;उपरोल्लेखित लेखाबद्दल :&lt;br /&gt;&lt;br /&gt;"दिवाळी अंकांचा दर्जा घसरला आहे" अशा स्वरूपाची मते असणे सहज शक्य आहे. तशी मते मांडण्यालाही हरकत नाही. बरीच नावं घाऊक प्रमाणात घेतली गेली आहेत. हे सर्व ग्राह्यतेच्या कक्षेत यायला कसलीच ना नाही. मात्र "अमुक लेखक/लेखिकांनी आता लिहू नये" असं म्हणणं काहीसं रोचक आहे. मला व्यक्तिशः अशा स्वरूपाची विधाने आवडत नाहीत खरी.&lt;br /&gt;&lt;br /&gt;दिवाळी अंकाना - आणि एकंदर सांस्कृतिक पर्यावरणामधे - मांद्य आलेले आहे. ही सद्दी सुमारांची आहे अशा स्वरूपाची मते अधून मधून मांडली जात असतात. माझ्यामते या सर्व चक्रमेनिक्रमेण घडणार्‍या गोष्टी आहेत. काही क्षेत्रांमधे काही काळ एकंदर अ‍ॅक्टिव्हिटीज् कमी होतात. काही काळ तेजीचा असतो. "सध्याचा काळ मोठा वाईट आला" अशा स्वरुपाच्या विधानांमधे स्मरणरंजनपर चुका तर होत नाहीत ना ? "जुने ते हिरण्मय, नवे ते टाकाऊ" अशी एकांगी भूमिका आपण घेत नाही आहोत ना ? हे तपासून पहाणे महत्त्वाचे. ज्या काळात आपण जगतो त्या काळाचे मूल्यमापन त्याच चालू क्षणी करू शकणे हे कठीण काम आहे. जगतापांनी "अमुकांचे लिखाण वाईट होते. यांनी थांबावे" असं म्हणताना लेखकांची जंत्री दिली आहे. त्याबरोबर त्यांनी नव्या जोमाच्या किंवा अनेक वर्षं लेखन करतानाही नवनवीन वाटा धुंडाळणार्‍या व्यक्तींची नावे लिहिली असती तर बरे झाले असते. आपण हे विसरता नये की, आसाराम लोमटे, समर खडस, जयंत पवार, निखिलेश चित्रे, जयदेव डोळे, कृष्णात खोत, यांच्यासारखे लेखक आपल्याला अलिकडच्या दिवाळी अंकांमार्फतच भेटलेले आहेत. या सर्वांनीही आपल्या लेखण्या मोडाव्यात असे त्यांचे म्हणणे आहे काय ? :)&lt;br /&gt;&lt;br /&gt;असो. जगतापांनी टाकलेले क्षकिरण साठीच्या दशकातल्या अशोक शहाण्यांपासून अलिकडे हर्डीकरांपर्यंत अनेकांनी टाकलेले आहेत आणि अशा स्वरूपाचा रिअ‍ॅलिटी चेक चांगलाच. मात्र, सुक्याबरोबर ओल्यालाही जाळणे, "throwing the baby out with the bath water" या संदर्भातला रिअ‍ॅलिटी चेक क्षकिरणाच्या उपकरणांनी करायला हरकत नाही :)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/2301518882851474855-1089708129022743167?l=muktasunit.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://muktasunit.blogspot.com/feeds/1089708129022743167/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=2301518882851474855&amp;postID=1089708129022743167' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2301518882851474855/posts/default/1089708129022743167'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2301518882851474855/posts/default/1089708129022743167'/><link rel='alternate' type='text/html' href='http://muktasunit.blogspot.com/2011/11/blog-post.html' title='२०११ दिवाळी : दिवाळी अंकांचा लेखाजोखा'/><author><name>MuktaSunit</name><uri>http://www.blogger.com/profile/00445626723230179642</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://1.bp.blogspot.com/-vZSy_JeY3tg/Ti7ehA38n5I/AAAAAAAAA6U/xfdKbNO0nnk/s220/rajan.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-2301518882851474855.post-726261500849149120</id><published>2011-03-09T13:44:00.000-08:00</published><updated>2011-10-24T07:46:52.677-07:00</updated><title type='text'>"रॉय "</title><content type='html'>खरं तर 'रॉय' हे क्रिश्चनांमधे , अमेरिकनांमधे माणसाचं नाव असतं हे मला माहिती नव्हतं. (रॉय कॅम्पबेल वगैरे नावं मी नंतर वाचली.) त्यामुळे रॉय विल्सन हे नाव पहिल्यांदा ऐकलं तेव्हा गंमत वाटली होती. रॉयचा नि माझा परिचय झाला ती गोष्ट योगायोगाची म्हणता येईल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आम्ही आमच्या पहिल्या घरात राहात होतो. घर लहान असले तरी तेव्हा आम्ही दोघेच असल्याने पुरेसे होते. घरात पहिले छोटे पाहुणे येणार याची चाहूल लागली आणि या घराचे बेसमेंट फिनिश करून घ्यावे असा विचार मनात घोळायला लागला होता. या संदर्भात कायकाय करावे लागते , एकंदर खर्च काय येतो याची चौकशी मी केली. वेगवेगळ्या स्वरूपाची एस्टीमेट्स घेतली. कामाचे स्वरूप आणि प्रमाण पाहता माझ्यासारख्याला हे झेपणार नाही याची खूणगाठ तर मी बांधलेलीच होती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;उन्हाळ्याचे दिवस. मी घरासमोर कसले तरी छोटेमोठे काम करत होतो. आमच्या शेजारच्या घराला शिडी लावून एक माणूस काम करत होता. वर्णाने काळ्या असलेल्या या माणसाला मी याआधी कधी पाहिले नव्हते; त्यामुळे हा कुणी कामकरी आहे हे मला जाणवतच होते. घराच्या कौलांचे कसलेसे काम चाललेले होते. मी हातातले काम करता करता त्याला हलो म्हणालो नि त्यानेही प्रतिसाद दिला. माझे काम संपवून मी घरात आलो नि मला काय वाटले कोण जाणे, मी परत बाहेर आलो नि त्याला विचारले , "तू कसली कसली कामं करतोस ?" त्याने काम थांबवले नि तो म्हणाला , "मी कुठलीही कामं करतो, कॉन्ट्रॅक्टिंग ची". मग मी म्हणालो , "आमचे बेसमेंट फिनिश करायचा माझा विचार आहे". तो म्हणाला, "थोड्या वेळाने मी आत येतो नि एकदा पाहून जातो."&lt;br /&gt;&lt;br /&gt;थोड्या वेळाने बेल वाजली. दारात हा गडी. एकंदर अमेरिकन लोकांचा सरसकट अंदाज येणं कठीण , पण हा पंचेचाळीस-पन्नासचा असावा. दणकट बांधा, मध्यम उंची. उन्हात काम करून घामाघूम झालेला. काहीसे मळकट कपडे घातलेले. घरात आल्यावर मी त्याला खाली नेले. त्याने एकंदर पाहाणी केली नि तो वर आला. " मी तुला माझे एस्टिमेट देतो." असं म्हणून गेला. जाताना माझा फोन नंबर घेऊन गेला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पुढच्या शनिवारी मला फोन करून दुपारच्या वेळी आला. यावेळी त्याच्याबरोबर एक तरुण मुलगा होता. तोही कृष्णवर्णीयच. रॉयने दिलेले एस्टीमेट मी पाहिलेल्या आताच्या एस्टीमेट्पेक्षा निश्चितच कमी होते. त्याने या एस्टीमेट्बरोबर आधीच्या क्लायंट्सनी दिलेली शिफारसपत्रेही आणलेली होती. प्लंबिंग आणि इलेक्ट्रिक फिटींग ची कामे तो इतराना देणार होता - थोडक्यात आउटसोर्स करणार होता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;हे काम मी रॉयला दिले. पुढच्याच आठवड्यात काम सुरु झाले. एक गोष्ट माझ्या लक्षात यायला लागली होती. रॉय कधीच एकटा ड्राईव्ह करून येत नाही. त्याच्याबरोबर कुणीतरी असतंच. त्याला राईड देणार्‍या व्यक्ती त्याच्याबरोबर काम क्वचितच करतात. बहुतांशी त्याला सोडण्यापुरत्याच त्या येतात. सामान आणणे/नेणे याकरता लागणारा मोठासा ट्रक रॉयपाशी नाही. पुढे सुमारे महिनाभर चाललेल्या या कामादरम्यान रॉयचे आमच्या घरी येणे अपरिहार्य होतेच; पण काही प्रसंगी त्याला मधूनच बाहेर पडावे लागणेही आवश्यक असयाचे. अशा वेळी त्याला ने आण करणार्‍या लोकांची वाट बघण्याऐवजी मीच त्याला नेऊ आणू लागलो. यात माझा वेळ जायचा खरा पण एकंदर काम वेळेत होण्याकरता ही नैमित्तिक गैरसोय मी सहन केली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्याला नेण्याआणण्याच्या दरम्यानच माझा नि रॉयचा संपर्क अधिक दृढ बनला. आतापावेतो झालेले बोलणे कामापुरते होते. कामाचे स्वरूप आणि प्रमाण निश्चित करणे , पैशाची देवाणघेवाण , कामाच्या निरनिराळ्या अवस्था, त्याची प्रगती वगैरे. त्याला नेता आणताना एकमेकांबद्दल थोडे बोलणे झाले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"सो, रॉय. तू ड्राईव्ह करत नाहीस. ही काय भानगड आहे ?"&lt;br /&gt;"काय सांगू ? माझी होती गाडी काही वर्षांपूर्वी. आता नाही."&lt;br /&gt;"काय झालं ?"&lt;br /&gt;"अरे काय सांगू. दारू पिऊन गाडी चालवत होतो. पोलिसाने पकडलं".&lt;br /&gt;"बाप रे. ड्रंक ड्रायव्हिंग. किती वर्षं झाली ?"&lt;br /&gt;"झाली ना पाचेक वर्षं. नक्की आठवत नाही आता."&lt;br /&gt;"पाच वर्षं !! ड्रंक ड्रयव्हिंग करता पाच वर्षं !"&lt;br /&gt;"आय डिड टाईम मॅन".&lt;br /&gt;हॉलिवूडपट पाहिल्याने याचा अर्थ मला माहितीच होता. मी दोन मिनिटं स्तब्ध.&lt;br /&gt;"दारू प्यायल्याबद्दल डायरेक्ट 'आतमधे' !?"&lt;br /&gt;"अरे.. मी निव्वळ दारू प्यालो असतो तर ठीक आहे. पण झालं असं की मी पोलिसाशी भांडलो."&lt;br /&gt;"अरे , तुला तर माहिती आहे, इथे आर्ग्युमेंट चालत नाही बाबा. पण एकदम जेल ?"&lt;br /&gt;"नाही... भांडण नुसतं शाब्दिक नव्हतं"&lt;br /&gt;बाबौ.&lt;br /&gt;त्याने माझं मन जणू वाचलं. तो पटकन म्हणाला ,&lt;br /&gt;" हे मॅन. डोंट वरी. त्यानंतर माझं रेकॉर्ड एकदम क्लीन आहे. तू ती रेकमेंडेशन लेटर्स वाचलीस ना ?"&lt;br /&gt;त्यानंतरच्या दिवसांमधे मी थोडा काळजीमधे होतो खरा.&lt;br /&gt;&lt;br /&gt;एकंदर काम पार पडले. दिलेल्या एस्टीमेट्च्या खर्चापेक्षा किंचितच अधिक खर्चात ; पण एस्टिमेट मधे दिलेल्या वेळेच्या नक्कीच अधिक वेळेत. रॉयकडे वाहन नव्हते हेच त्याचे उघडउघड कारण होते. पण फार भयंकर उशीर झाला नाही आणि एकंदर कामाचा दर्जा समाधानकारक होता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;हे काम चालू असताना काही प्रसंग असे आले की काम उशीरापर्यंत चालायचे. अशावेळी रॉयला घरी सोडायचा प्रसंग आला. या सर्व प्रवासात माणसे हळुहळू एकमेकांशी बोलायला लागतात , मोकळी होतात तेच आमचेही झाले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"मग रॉय, तुझं वय काय रे ?"&lt;br /&gt;"मी बावन्न वर्षांचा आहे. "&lt;br /&gt;"वॉव. तुझ्यापेक्षा पंधरा-सतरा वर्षांनी लहान आहे मी"&lt;br /&gt;"हो मला दिसतंच आहे. तुला तर मुलंही झाली. आम्ही तसेच."&lt;br /&gt;"अरे मुलं म्हणजे.. दोन एकदमच ना ! नाहीतर एकच तर असतं."&lt;br /&gt;"मुद्दा तो नाही आहे, आणि तुलाही माहिती आहेच" - इति रॉय.&lt;br /&gt;"अँड व्हॉट इज द पॉईंट रॉय ?" - मी.&lt;br /&gt;"अरे दोन ब्यागा घेऊन येता तुम्ही. घरं बांधता. लगीन करता. मुलं होतात तुम्हाला. पुढची पीढी आता इथेच. आणि आम्ही काळे लोक. चोर्‍यामार्‍या करतो. एकंदर रखडतो. "&lt;br /&gt;हम्म. जी गोष्ट मी ऑफिसातल्या गोर्‍या माणसांच्या नजरेत वाचतो तीच गोष्ट एक कामकरी वर्गातला काळा माणूस विनासंकोच सांगत होता.&lt;br /&gt;"अरे रॉय, हे खराय की आमच्या गाड्या नि घरं दिसतात. पण गाडी तर सगळ्यांची असतेच ना अमेरिकेत."&lt;br /&gt;हे बोललो नि मनातल्या मनात जीभ चावली. काही क्षण गेले.&lt;br /&gt;"अरे, तू काय मुद्दाम बोलला नाहीस मला माहिती आहे. घाबरू नको. धिज ब्लॅक मॅन इज नॉट गोईंग टू जंप यू. रिलॅक्स."&lt;br /&gt;आम्ही दोघेही हसायला लागलो.&lt;br /&gt;"रॉय अरे इतर सगळ्यांप्रमाणेच आम्हीही मॉर्ट्गेज घेऊनच घरं घेतो बाबा. आयुष्यभराचं कर्ज."&lt;br /&gt;"हो ना. पण त्याच्याकरता देशाबाहेरून आलेल्या तुम्हा इंड्यन आणि चायनीज माणसाना सरकार पैसे देतं ना !" - इति रॉय.&lt;br /&gt;बाबौ !&lt;br /&gt;"वोह वोह वोह रॉय. व्हॉट आर यू टॉकिंग अबाऊट मॅन !"&lt;br /&gt;"तुला ठाऊकाय मी काय म्हणतो ते. पैसे मिळतात ना तुम्हाला सरकार कडून. आम्हा काळ्यना काही नाही !"&lt;br /&gt;या पुढचे सगळे संभाषण त्याला "असले काही नसते" हे सांगण्यात गेले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;रॉयला नेण्या आणण्याच्या दिवसांत त्याचं राहातं घर मी एकदा पाहिलं होतं. एका मध्यमवर्गीय भागातल्या घरात पेईंग गेस्ट म्हणून तो राहायचा. त्याला सोडायला घरात गेलो तर त्याच्या घरमालकीण बाईना हलो म्हण्टलं. सत्तरीला आलेली एक गोरी अमेरिकन बाई. एकटीच राह्यची. तिला रॉयची भरपूर मदत व्हायची. आणि बहुदा रॉयकडून ती घेत असलेले भाडे बरेच कमी असावे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;रॉयची पहिली ओळख नि पहिले काम करवून घेणे या गोष्टीना सुमारे आठ वर्षे झाली. या नंतरच्या काळात माझ्या नि रॉयच्या वर्षाकाठी किमान चार पाच भेटी तरी झाल्याच. भेटी कामानिमित्तच व्हायच्या. काही कामे वर्षाकाठची तर काही नैमित्तिक. यातून रॉयच्या आयुष्यात झालेले बदल मला कळत नकळत जाणवत होते. मी दिलेल्या कामामुळे त्याला एक जुनाट का होईना , पण गाडी घेता आली. काय मौज आहे पहा. माझ्या कामादरम्यान गाडीची नितांत गरज होती पण गाडी घेता आली काम संपल्यावरच. पण त्यामुळे का होईना यापुढच्या भेटीत त्याला गाडीतून नेण्या आणण्याचे प्रसंग काही काळ आले नाहीत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;हळुहळू , मला असा कुणीतरी स्वस्तात काम करून देणारा माणूस भेटला आहे या गोष्टीची खबर - जशी कुठल्याही डीलची खबर सर्वात आधी जिथे पोचते त्या - माझ्या देसी बांधवांपर्यंत पोचलीच. यांपैकी कुणी मग रॉयला डेक दुरुस्त करण्याचे , तर कुणी बाथरूम चे तर कुणी बगिच्याचे काम दिले. अशा प्रकारे , रॉयला नियमित काम मिळवून देण्यात मदत केल्याबद्दल रॉयचा आणि प्रसंगी सस्त्यात काम करून मिळाल्याबद्दल माझ्या देशबांधवांचा दुवा मी मिळविला. अर्थात क्वचित प्रसंगी या पुष्पगुच्छांबरोबर वीटाही खाव्या लागल्या.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"अरे रॉय, तू त्या अमक्याअमक्याबरोबर काय भांडण केलेस ?"&lt;br /&gt;"म्हणजे ? तू त्याला ओळखतोस ?"&lt;br /&gt;"रॉय , तो इंडियन आहे !"&lt;br /&gt;"आय शुड हॅव नोन. नाहीतर मला कुणा इंडियनकडून कॉल येईल कसा !"&lt;br /&gt;"अरे पण काय झालं ?"&lt;br /&gt;"यू इंडियन्स. यू गाईज थिंक यू आर बेटर दॅन अस."&lt;br /&gt;"रॉय. लास्ट आय चेक्ड, मी पण इंडियन आहे"&lt;br /&gt;"नॉट यू मॅन . आय नो यू डोंट थिंक लाईक दॅट".&lt;br /&gt;(मी मनातल्या मनात : "दॅट्स प्रॉबेबली बीकॉज आय अ‍ॅम नॉट बेटर दॅन यू".)&lt;br /&gt;"बट दॅट गाय मॅन. ही वॉज टॉकिंग टू मी लाईक आय अ‍ॅम स्टुपिड !" - रॉय.&lt;br /&gt;"हाऊ डू यू नो रॉय ? "&lt;br /&gt;" अ ब्लॅक मॅन नोज , रॉज !" - इति रॉय.&lt;br /&gt;&lt;br /&gt;हो ते सांगायचं राह्यलंच : त्याला राज हे माझे घासून गुळगुळीत झालेले संक्षिप्त नाव कधी म्हणता आले नाही. तो नेहमी "रॉज" "रॉज" करतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;असो. आमच्या आतापर्यंतच्या सहवासात असे अनेक संवाद झडले. अमेरिकन समाजात असलेले कन्व्हेन्शनल विस्डम , पोलिटिकल करेक्टनेस या गोष्टी त्याच्याकडे अभावाने आहेत हे आतापावेतो मला नीट समजलेले आहे. मात्र असे असूनही त्याच्याकडून मी नक्कीच काहीतरी शिकलो आहे. काही तांत्रिक गोष्टी तो कसा करतो आहे हे नीट पाहून शिकलो नि नंतर त्या गोष्टींकरता परत त्याला बोलावले नाही. म्हणजे थोडक्यात , भारतीय कंपन्या जे करतात तेच मी करत आहे की ! अर्थात काही अंगमेहनतीच्या किंवा किचकट कामांकरता त्याला कधीतरी बोलावणे होतेच.&lt;br /&gt;&lt;br /&gt;रॉयच्या निमित्ताने एक निराळी अमेरिका मी पाहतो. आतापर्यंत पाहिलेली अमेरिका ऑफिसमधली किंवा शेजारपाजारचे लोक किंवा आता मुले थोडी मोठी होऊ लागल्यावर त्याच्या वर्गातल्या मुलांचे पालक. हे सर्व लोक पांढरपेशा आहेत. त्यांचे प्रश्न , त्यांची त्यानी शोधलेली उत्तरे , त्यांचे जीवनमान, चालीरीती टिपिकल अमेरिकन सबर्बिया मधल्या. रॉय आणि त्याच्या अनुषंगाने भेटलेल्या लोकांची दुनिया वेगळी. विकसित देशांमधेही एकंदर विकासाची फळे न चाखलेल्या , रस्ता हरवलेल्या नि सदा रस्ता शोधावा लागलेल्या लोकांकडे पाहायची माझी खिडकी म्हणजे रॉय. आजही अमेरिकेत असे रॉय आहेत ज्यांच्याकडे कवडीचेही सेव्हिंग नाही. त्यांचं पोट अक्षरशः हातावर असतं. एकदा अनेक आठवडे रॉयने माझ्या फोन कॉलना नि मेसेजेस ना उत्तर दिलं नाही. तेव्हा कळलं तो कुठे काम करत असताना पडला. हॉस्पिटलमधे होता. इन्शुरन्स वगैरे असण्याचा काही संबंध नव्हता. आता त्याला सुमारे साठेक हजारांचे बिल फेडायचे आहे. कितीतरी वर्षांत तो डेंटिस्ट कडे गेलेला नाही. इतकंच काय , कितीतरी वर्षांत त्याने टॅक्स भरण्यासारखी मूलभूत गोष्ट केलेली नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;अशा व्यक्तींची सामाजिक, राजकीय मते हा एकंदर मजेदार प्रकार असतो. दोन वर्षांमागे ओबामा निवडून आल्यावर मी रॉयला विचारले. तो म्हणतो :&lt;br /&gt;"मला त्याचे काय ? आणि हे लोक तर बहुदा त्याला मारूनच टाकतील."&lt;br /&gt;"हे लोक ? कोण लोक ?" - मी.&lt;br /&gt;"दीज व्हायटीज् , मॅन !".&lt;br /&gt;&lt;br /&gt;एकदा कसलेही काम नसताना त्याचाच फोन मला आला. संध्याकाळी वेळ असेल तर भेटू म्हणून. मला काय वाटले माहिती नाही. मीही गेलो.&lt;br /&gt;अंधारी खोली. त्यात रॉयचे दोन मित्र बसले होते. रॅपम्युझिक चालू होते. धूर भरलेला. माझी त्याने ओळख करून दिली. मी बीअर घेतली. रॉय ने मला जळती सिगरेट दिली.&lt;br /&gt;"मी सिगरेट स्मोक करत नाही रॉय. तुला माहिती आहे."&lt;br /&gt;"धिस इज नॉट सिगरेट मॅन."&lt;br /&gt;"ओह. तरीच मला भयंकर वाटत होता वास मारियुआनाचा."&lt;br /&gt;"धिस इज नॉट दॅट."&lt;br /&gt;&lt;br /&gt;मी लगेच गाशा गुंडाळला. "अदिओस, वामोस". त्यानंतर परत पार्टीला जायची हिंमत केली नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;कधीकधी रॉयचा विचार करतो तेव्हा वाटतं , मार्क्सने ज्याचं वर्णन प्रोलिटॅरिएट असं केलं ते याच्यापेक्षा काय वेगळं असणार. रॉयसारख्या माणसांच्या हातून बोल्शेव्हिक क्रांती होईल असा एक गमतीदार विचार माझ्या डोक्यात येऊन गेला. नारायण सुर्व्यांच्या कविता वाचताना "भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बरबाद झाली" असे शब्द येतात. याचा नक्की अर्थ काय याचे जिवंत उदाहरण माझ्या डोळ्यासमोर आहे. रॉयच्या आईला मी एकदा भेटलो आहे. थंड कोरड्या नजरेतल्या सर्व अपेक्षा संपलेल्या. दे गॉट नथिंग टू लूज. दे जस्ट गॉट नथिंग...&lt;br /&gt;&lt;br /&gt;परवाच माझ्याकडे काही कामानिमित्त आलेला होता. माझी बायको मुलाना घेऊन जात होती. कुठे जात आहेत याची त्याने चौकशी केली. पोरं कसल्याशा सॉकर प्रॅक्टिस ला जात होती. "नाईस रॉज , नाईस. ब्लॅक किड्स वेअर देअर हूड्स अँड लर्न टू ब्रेक इन्टू समवन्स हाऊस. युअर किड्स गो टू सॉकर. हा हा हा"&lt;br /&gt;&lt;br /&gt;मग नेहमी प्रमाणे आम्ही बसून एक बीअर घेतली.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/2301518882851474855-726261500849149120?l=muktasunit.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://muktasunit.blogspot.com/feeds/726261500849149120/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=2301518882851474855&amp;postID=726261500849149120' title='9 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2301518882851474855/posts/default/726261500849149120'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2301518882851474855/posts/default/726261500849149120'/><link rel='alternate' type='text/html' href='http://muktasunit.blogspot.com/2011/03/blog-post.html' title='&quot;रॉय &quot;'/><author><name>MuktaSunit</name><uri>http://www.blogger.com/profile/00445626723230179642</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://1.bp.blogspot.com/-vZSy_JeY3tg/Ti7ehA38n5I/AAAAAAAAA6U/xfdKbNO0nnk/s220/rajan.jpg'/></author><thr:total>9</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-2301518882851474855.post-5640517471408680603</id><published>2010-11-27T09:38:00.000-08:00</published><updated>2010-11-27T09:44:42.978-08:00</updated><title type='text'>अश्विनी कुलकर्णी यांची मी घेतलेली मुलाखत</title><content type='html'>"कीं घेतले व्रत न हे अम्ही अंधतेने"&lt;br /&gt;&lt;br /&gt;महाराष्ट्राची महती गाणारी अनेक गाणी आहेत; सुवर्णमहोत्सवाच्या या वर्षात आपल्या राज्याच्या प्रगतीचा लेखाजोखा घेतला जाईलच. मात्र या सार्‍या बिरुदांमध्ये माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची उपाधी म्हणजे, महाराष्ट्र हे कार्यकर्त्यांचे मोहोळ म्हणून मानले गेलेले आहे. सामाजिक उन्नयनाच्या विविध बाबींकरता झटणार्‍या कार्यकर्त्यांच्या पिढ्यांमागून पिढ्या जिल्ह्याजिल्ह्यातून येथे काम करताना दिसतात. अनिल अवचट, अभय बंग, आमटे परिवार ही नावे आपल्या सर्वांना अपरिचित बिलकुल नाहीत. या सर्वार्थाने मोठ्या माणसांच्या नंतर आलेल्या पिढीतल्या , नव्या दमाच्या लोकांची ओळख प्रस्तुत सदरावाटे करून देण्याचा, हा एक नम्र प्रयत्न.&lt;br /&gt;&lt;br /&gt;या उदात्त परंपरेचाच वारसा सांगणार्‍या एका तडफदार आणि बुद्धिमान कार्यकर्तीची आपण एका मुलाखतीद्वारे ओळख करून घेणार आहोत. नाशिकच्या 'प्रगती अभियान' या संस्थेच्या अध्वर्यू अश्विनी कुलकर्णी यांच्याशी केलेली ही बातचीत. रोजगार हमी योजना आणि माहितीचा अधिकार या योजनांचा जनकल्याणाकरता उपयोग करून देण्याकरता झटणार्‍या या कार्यकर्तीचे नाव अलीकडे प्रकाशात आले, ते 'लोकमत' व 'लोकसत्ता'मध्ये त्यांनी लिहिलेल्या लेखांमुळे. ज्यांनी माहितीच्या अधिकाराच्या कायद्याचा वापर करून स्वच्छ, पारदर्शी व्यवहाराची अपेक्षा प्रशासनाकडून ठेवली, 'व्यवस्थे'त, कार्यप्रणालीत आमूलाग्र बदल घडवण्याचा प्रयत्न केला, काही प्रमाणात घडवला; त्यांनाच 'लक्ष्य' करून संपवण्याचे प्रकार आता सुरू झाले आहेत.अश्विनीबाईंचे कार्य हे आता केवळ एका विधायक कामाचेच राहिलेले नसून, या भीषण घटनांमुळे त्याला आता पराक्रमाचेच स्वरूप प्राप्त झालेले आहे. उपक्रमाने या कामाची उत्तम दखल घेतलेली आहे. दुवा : http://mr.upakram.org/node/2706 . उपक्रमावरच्या या लेखातून प्रेरणा घेऊनच प्रस्तुत मुलाखत घेतली गेली हे इथे आवर्जून नमूद केले जायला हवे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मुलाखतीचे प्रमुख अंश पुढीलप्रमाणे :&lt;br /&gt;&lt;br /&gt;प्रश्नकर्ता : नमस्कार. तुम्ही आवर्जून देत असलेल्या वेळाबद्दल आभार. तुम्ही लिहिलेला लेख वाचनात आला. २००५ पासून अस्तित्वात आलेल्या माहितीच्या कायद्याबद्दल आता पुष्कळ माहिती उपलब्ध आहे. या कायद्याचा वापर करून सरकारी आणि इतर कंत्राटदार-धंदेवाईक लोकांनी केलेले अपप्रकार उघडकीला आल्याच्या कथा आता इंटरनेटवर वारंवार वाचायला मिळतात. मात्र तुम्ही जो लेख लिहिलात तो अतिशय धक्कादायक होता. या लेखामुळे तुमच्याशी बोलणे महत्त्वाचे वाटले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;सर्वप्रथम, तुमच्या संस्थेबद्दलची माहिती www.pragatiabhiyan.org या साईटवर आम्ही वाचली. तुमच्या या कामाबद्दल थोडी प्राथमिक माहिती सांगता का ?&lt;br /&gt;&lt;br /&gt;अश्विनी : आमची संस्था नवी आहे. मात्र तिच्या स्थापनेच्या आधीपासून सुमारे वीस वर्षे काम चालू आहे. हे सर्व काम नाशिक परिसरातल्या ग्रामीण भागाशी संबंधित आहे. रोजगार हमी योजना , रेशनव्यवस्था, माहितीचा अधिकार आणि शेतीविषयक सरकारी धोरणे या संदर्भात काम चालू आहे. यापैकी रोजगारासंबंधी आम्ही केलेले काम बर्‍याच मोठ्या प्रमाणातले आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;प्रश्नकर्ता: "रोहयो" या नावाने ओळखली जाणारी रोजगार हमी योजना ही महाराष्ट्राकरता बरीच जुनी आहे, नाही का ? महाराष्ट्र सरकारने अभिमान बाळगावा असा तो प्रकल्प होता. आजचे वास्तव काय आहे ?&lt;br /&gt;&lt;br /&gt;अश्विनी : २००५ मध्ये हा कायदा राष्ट्रीय पातळीवर अस्तित्वात आला. मात्र महाराष्ट्रात १९७० व १९८०च्या दशकांत रोहयो अतिशय उत्तम पद्धतीने राबवली गेली. ज्या सर्व पायाभूत सोयी दिसतात त्या त्यामुळेच. पश्चिम महाराष्ट्रात सिंचन, बारमाही पिके, कच्चे-पक्के रस्ते, कालवे यासारख्या मूलभूत गोष्टी दिसतात, त्या सर्वाचे प्रमुख श्रेय हे त्या काळातल्या रोहयोचे आहे. एकीकडे लोकांच्या हातात क्रयशक्ती मिळवून देणे आणि दुसरीकडे गावात मूलभूत सोयी निर्माण करणे हे मॉडेल उत्तम रीतीने राबवले गेले. मात्र नव्वदीच्या दशकात यात बरीच पीछेहाट झाली. जिथून मागणी आहे तिथेच नोकरशाही काही करत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. रोहयोची खरी गरज कुणाला? तर भूमिहीन, अल्पभूधारक असा जो नडलेला , पीडित वर्ग आहे त्याला. असा सगळ्यात दुबळा जो वर्ग - सरकारच आपल्याला मदत करत नाही, म्हणून या वर्गातल्या माणसाकडून काही लढा, आंदोलने होतील ही अपेक्षाच चूक आहे. तर असा हा वर्ग आणि दुसरीकडे मुजोर नोकरशाही या विपरीत परिस्थितीमुळे ही गुणी योजना सपशेल बारगळली. २००५ साली केंद्र सरकारचा कायदा आल्यावर त्याला नवसंजीवनी मिळाली. आता कुठे परत महाराष्ट्रात हालचाल सुरु झाली आहे. मी गेल्या वर्षभरात आंध्र प्रदेशचा अभ्यास करते आहे. मूलभूत सुविधा निर्माण करण्याकरता , या योजनेचा अतिशय उत्तम रीतीने वापर खेडोपाडी होताना त्या राज्यात दिसतो आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;प्रश्नकर्ता : तुम्हाला थोडे मधेच अडवतो. नव्वदीच्या दशकात झालेल्या आर्थिक धोरणविषयक बदलाचा काही संबंध येथे आहे काय?&lt;br /&gt;&lt;br /&gt;अश्विनी : एक गोष्ट खरीच की १९९१ साली आलेल्या नव्या वार्‍यांमुळे "मार्केट वुइल टेक केअर ऑफ एवरीथिंग" अशा प्रकारचे विचार सरकारी पातळीवर पुढे येऊ लागले. या धोरणांमुळे एकंदर आर्थिक घोडदौडही सुरू झालीच. या विकासाच्या कक्षेत सर्वजण येतील आणि यातून अंतिमतः सर्वांचाच विकास होईल अशी धारणा होती. मात्र १९९१ सालच्या आर्थिक धोरणांच्या घोषणेनंतर , २००५ साली रोजगार हमीचा कायदा राष्ट्रीय पातळीवर यावा लागतो याचा अर्थच असा की, या आर्थिक धोरणांचा फायदा हवा तसा तळागाळापर्यंत पोचू शकला नाही. गरीब-श्रीमंतांमधली दरी वाढली. मुक्त बाजारपेठेशी गरीबांना जोडले जाण्याचा रस्ता उपलब्ध नाही असे चित्र निर्माण झाले. या परिस्थितीत गरीबांच्या हातात साधने यावीत म्हणून ही योजना आली असे म्हणावे लागते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;प्रश्नकर्ता : या सगळ्या संदर्भात , तुमचे काम कुठे येते ?&lt;br /&gt;&lt;br /&gt;अश्विनी : आम्ही नाशिकच्या परिसरातल्या आदिवासी भाग , इतर ग्रामीण भाग यांना रोहयो आणि इतर गोष्टींची माहिती पुरवतो. वेगवेगळ्या योजना काय, त्यांचा फायदा कसा घेता येईल, यात तुमच्या अडचणी काय, त्यांचे निवारण कसे करता येईल, सरकारी नियम, कागदपत्रे, तक्रारी नोंदवण्याची सोय या सर्वांबद्दलची अद्ययावत माहिती तळागाळातल्या लोकांना पुरवण्याचे काम आम्ही सतत करतो. रोहयो, रेशन वितरणव्यवस्था याचा सतत पाठपुरावा करणार्‍या कार्यकर्त्यांची फळी आता उभी झाली आहे. याचबरोबर महाराष्ट्रातून जेव्हा संघटना बोलावल्या जातात तेव्हा त्यांना प्रशिक्षण देण्याच्या कामात पुस्तिका, पोस्टर्स याद्वारे महत्त्वाचा हातभार आम्ही लावतो. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रश्नांबाबतचे भान राज्यकर्त्यांना येत राहावे म्हणून वर्तमानपत्र व नियतकालिकांमधे या संदर्भात लिखाण मी करते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;प्रश्नकर्ता : थोडे माहितीच्या अधिकाराबद्दल. २००५ साली अस्तित्वात आलेला हा कायदा तुमच्यासारख्यांना वापरता यावा याबद्दलचे तुमचे "व्हिजन" काय आहे ?&lt;br /&gt;&lt;br /&gt;अश्विनी : हा कायदा म्हणजे आम्हाला वरदान आहे. पूर्वी सरकारी कारभारात अमुक अमुक गोष्टी होत नाहीत हे नुसते बोलावे लागायचे. आता हे सर्व जिल्हा-तालुका-गावाच्या पातळीवर आकडेवारीसकट सांगता येणे शक्य झालेले आहे. हा नेमकेपणा आल्यामुळे आमच्या मागण्यासुद्धा नेमक्या झाल्या. ज्या माहितीच्या आधारे सरकारने निर्णय घ्यायला हवेत तीच माहिती आता तुम्हालाही मिळते ! मग या माहितीच्या आधारे आम्हाला वाटाघाटींच्या टेबलावर येण्यासाठी "अ‍ॅम्युनिशन"च मिळालेले आहे असे म्हणा ना !&lt;br /&gt;&lt;br /&gt;प्रश्नकर्ता: हम्म. याचा अर्थ इंग्रजीत "लेवलिंग द फिल्ड्स" असे म्हणता येईल. कार्यकर्ते आणि एकंदर प्रशासकीय-राजकीय पातळीमधे पूर्वी जो असमतोल होता तो आता या कायद्यामुळे दूर झाला असे म्हणता येईल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;अश्विनी : अगदी अगदी! सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा एकमेव कायदा असा आहे की ज्याला दंडात्मक शक्ती आहेत. जो सरकारी कर्मचारी माहिती पुरवत नाही त्याला त्याच्या पगारातून दंड होण्याची तरतूद या कायद्यात आहे आणि असे दंड केले जात आहेत! "तुम्ही जनतेचे सेवक आहात" याची जाणीव करू देणारे अधिकारच जणू आम्हाला मिळालेत. आम्हांला काही त्यांच्याशी वैर करायचे नाही. हे सरकार आपलेच आहे. "तुम्ही आम्ही मिळून सकारात्मक बदल घडवू" असेच आम्हाला यातून म्हणायचे आहे. कितीतरी मोठ्या प्रमाणावरची माहिती आता http://nrega.nic.in/netnrega/home.aspx या वेबसाईटवर आता मिळेल . आता भारतातल्या कुठल्याही गावात कुठलीही योजना आली की त्याची माहिती इथे येते. मग त्या योजनेच्या सर्व बारीकसारीक तपशीलांमधून त्याचा पाठपुरावा कार्यकर्त्याना घेता येतो. पब्लिक डॉमेन मधे सतत येणार्‍या या माहितीचे स्वरूप म्हणजे माहितीच्या अधिकाराचा खरा वापर.&lt;br /&gt;&lt;br /&gt;प्रश्नकर्ता : या बाबतीत प्रशासन "फारच लोक एकदम माहिती विचारतात . मग ती कशी पुरवायची ?" अशा तक्रारी करताना ऐकतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;अश्विनी : हा प्रश्नच अप्रस्तुत आहे. हे असे का होते ? कारण रेकॉर्ड-कीपींग बरोबर नाही. कंप्युटाराजेशन नाही. तुमचा डेटाबेस नीट असेल तर अशा सर्व अडचणी येणारच. त्यावर व्यवस्था अद्ययावत करणे हे खरे उत्तर आहे. माहिती विचारण्यापासून परावृत्त करणे नव्हे!&lt;br /&gt;&lt;br /&gt;प्रश्नकर्ता : व्हिसलब्लोअर कायद्याचे विधेयक लवकरच पास होईल. याचा फायदा होईल का ?&lt;br /&gt;&lt;br /&gt;अश्विनी : नक्कीच. माहितीचा अधिकार फक्त माहितीच देतो. परंतु एखाद्या गैरव्यवहारासंदर्भातली माहिती जरी हाताशी आली तरी तिचे काय करावे हे हा कायदा सांगत नाही. आता व्हिसलब्लोअर अ‍ॅक्ट नंतर अशा स्वरूपाची अथॉरिटी अस्तित्वात आली तर कार्यकर्त्याना न्यायदानाची पुढची पायरी नक्की गाठता येईल. या करता असणारी अनामिकता व्हिसल ब्लोअर अ‍ॅक्ट देऊ शकेल. सद्यस्थितीत जनहितार्थयाचिका हे साधन फार अपुरे आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;प्रश्नकर्ता : आता थोडेसे संवेदनशील भागाबद्दल. तुम्ही तुमच्या लेखात म्हटल्याप्रमाणे , या कायद्याचा वापर करू पाहाणार्‍या व्यक्तींच्या हत्या होत आहेत - अगदी आपल्या महाराष्ट्रात !&lt;br /&gt;&lt;br /&gt;अश्विनी : हे प्रकार होत आहेत हे सत्य आहे. हत्या झालेले लोक एक प्रकारे सामाजिक कार्यकर्तेच म्हणायला हवेत. माहितीचा अधिकार वापरून जंगले, खाणी यांसारख्या राष्ट्रीय संपत्तीचा अपहार केल्याची माहिती केवळ मिळवल्यामुळे हे लोक प्राणाला मुकले. यांनी माहितीचा वापर करायच्या आधीच, केवळ या संदर्भात माहिती मिळवली म्हणून. एकाची हत्या हायकोर्टात झाली. पुण्यातल्या एकाची हत्या एका नगरसेवकाचे अपप्रकार उघडकीला आणल्यावर दिवसाढवळ्या.&lt;br /&gt;&lt;br /&gt;प्रश्नकर्ता : म्हणजे हे पूर्ण बजबजपुरीचे वातावरण आहे का? या संदर्भात तुम्ही लेख लिहिलात तेव्हा तुम्हाला भीती वाटली का?&lt;br /&gt;&lt;br /&gt;अश्विनी : अजून परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही. या सर्व हत्यांना नाही म्हटले तरी वैयक्तिक वैमनस्याचा रंग आहे. सरकारी व्यवस्थेतल्या समस्या उघडकीला आणणे आणि अशा गैरव्यवहार करणार्‍या व्यक्तीला उघडे पाडणे, यांच्या हेतू आणि परिणामांमधे फरक आहेच. सरकारी व्यवस्थेतल्या अपप्रकारांना सुधारण्याचे विधायक स्वरूपाचे काम करणार्‍यांना अजून तरी धोका आहे असे दिसत नाही. एकाच व्यक्तीला लक्ष्य करून भारतातला भ्रष्टाचार नष्ट होणे अशक्य आहे. याउलट व्यवस्थेतले दोष दुरुस्त करून केवढे तरी विधायक काम करणे शक्य आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;प्रश्नकर्ता : या संदर्भात हौतात्म्य न पत्करण्याबद्दल आणि एकंदर मोठे व्हिजन डोळ्यासमोर ठेवल्याबद्दल मी तुमचे अभिनंदनच करतो ! आता थोडे पुन्हा तुमच्या संस्थेबद्दल. तुमच्या डोळ्यासमोर काही योजना आहेत का?&lt;br /&gt;&lt;br /&gt;प्रश्नकर्ता : धन्यवाद. प्रगती अभियानाला यंदा सरकारकडूनच बोलावणे आलेले आहे. आम्ही केलेल्या कामाचेच मॉडेल विस्तृत प्रमाणात कसे वापरता येईल, याबद्दल सरकारकडूनच आम्हांला विचारणा आता होत आहेत ! आमचे रेशनिंग व्यवस्थेबद्दलचे काम उत्तम रीतीने चालू आहे , तेच मोठ्या प्रमाणात करायचे मनात आहे. यंत्रणांमधे मूलभूत बदल करण्याची संधी मिळेल अशी आशा निर्माण झाली आहे. रेशनिंग व्यवस्थेला पर्याय म्हणून "फूड स्टँप्स" किंवा गरीब लोकांकरता अन्नाकरता "क्रेडीट" कार्डसदृश्य व्यवस्था असे काही सुचवण्याचे चाललेले आहे. एकंदर सगळा प्रवास "गुड गव्हर्नन्स" कडे आहे. असे कार्यक्रम राबवत राहाणे हेच ईप्सित आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;प्रश्नकर्ता : मदत मिळवण्याकरता ८०-जी आणि परदेशातून मदतीच्या दृष्टीने तुम्ही पावले उचलली आहेत काय ?&lt;br /&gt;&lt;br /&gt;अश्विनी : ही दोन्ही रस्जिस्ट्रेशन्स झालेली आहेत. आम्हाला कुठलीही सरकारी मदत मिळत नाही. मात्र सरकारी विकासकामांकरता, सरकारबरोबर काम करणे चालू आहे. याचीच पुढची पायरी म्हणून सरकारची योजना आम्हालाच राबवण्याची संधी मिळाली आहे. महाराष्ट्रात काम करणार्‍या लोकांची, कामाची बिलकुल उणीव नाही. अजूनही वेगवेगळ्या कार्यकर्त्यांचे मोहोळ अस्तित्वात आहे. विधिमंडळाच्या बाहेरचे घटकच आता सरकारला जाब मागत आहेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;प्रश्नकर्ता: तुमच्या व्यग्र दिवसातून वेळ दिल्याबद्दल अनेक आभार. तुमच्या माहितीइतकीच तुम्ही आम्हांसारख्यांना दिलेली प्रेरणा आम्हांला महत्त्वाची आहे.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/2301518882851474855-5640517471408680603?l=muktasunit.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://muktasunit.blogspot.com/feeds/5640517471408680603/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=2301518882851474855&amp;postID=5640517471408680603' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2301518882851474855/posts/default/5640517471408680603'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2301518882851474855/posts/default/5640517471408680603'/><link rel='alternate' type='text/html' href='http://muktasunit.blogspot.com/2010/11/blog-post.html' title='अश्विनी कुलकर्णी यांची मी घेतलेली मुलाखत'/><author><name>MuktaSunit</name><uri>http://www.blogger.com/profile/00445626723230179642</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://1.bp.blogspot.com/-vZSy_JeY3tg/Ti7ehA38n5I/AAAAAAAAA6U/xfdKbNO0nnk/s220/rajan.jpg'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-2301518882851474855.post-4353378163869433804</id><published>2010-06-21T21:27:00.000-07:00</published><updated>2010-06-21T21:28:31.274-07:00</updated><title type='text'>"आत्मा ते जनुक"</title><content type='html'>मराठी भाषेच्या एकंदर स्थितीचा विचार करताना ज्ञानाच्या निरनिराळ्या शाखांमधला गहन आशय सोप्या भाषेत परंतु विषयाची यथायोग्य ओळख करून देणार्‍या पुस्तकांच्या अभावाचा उल्लेख येतो. इंग्रजीच्या तुलनेमधे या गोष्टीमधे नक्की तथ्य आहे; परंतु त्याचवेळी जे काम चालले आहे त्याचा वेधसुद्धा घेणे महत्त्वाचेच.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मराठीमधे अर्थातच अशा प्रकारचे लिखाण होत असते. थोडा शोध घेतला तर आपल्याला जाणवते की अशा प्रकारच्या लिखाणाला आता मराठीमधे बाजारपेठही चांगली आहे. विविध प्रदर्शनांमधे, पुस्तकांच्या दुकानांमधे अशा पुस्तकांना ग्राहकवर्ग मिळताना दिसतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आज या प्रकारच्याच एका पुस्तकाची ओळख करून द्यावी म्हणतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आज ज्याला आधुनिक वैद्यक मानले जाते त्याचा ज्ञात इतिहास सुमारे अडीच हजार वर्षांचा आहे. विविध संस्कृतींमधे वेगवेगळ्या टप्प्यांमधे कायकाय नि कसकशी प्रगती झाली, त्यात महत्त्वाचे टप्पे काय होते, ज्ञानाची प्रगती कसकशी झाली , त्यात काय अडथळे आले, हा सगळा अर्थातच एका नव्हे तर अनेक खंडांच्या आवाक्यात आरामात बसेल इतका गहन आणि विस्तृत असा विषय आहे. विविध भाषांमधे अनेक ज्ञानकोष या विषयाला वाहिलेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;डॉ. चंद्रकांत वागळे यांनी लिहिलेल्या "आत्मा ते जनुक" या पुस्तकाचा विषय ढोबळ मानाने हाच आहे. अनेक शतकांच्या इतिहासातले महत्त्वाचे टप्पे थोडक्यात दाखवल्यामुळे , या छोट्याशा पुस्तकाला एका नकाशाचे स्वरूप आलेले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे , ज्ञानाच्या या ब्रह्मांडाचे दर्शन या पुस्तकरूपी पिंडात करताना, त्यांनी एक महत्त्वाचे सूत्र राखलेले आहे. आणि सगळा प्रवास या सूत्राने होतो. कोणते बरे हे सूत्र ?&lt;br /&gt;&lt;br /&gt;मानवजातीच्या प्रगतीचा वेध घेताना सामान्यतः असे मानले जाते की, माणसाला निसर्गातल्या गोष्टींचे कुतुहल होते. ज्ञानविज्ञानाच्या प्रगतीमागे या कुतुहलाचा मोठा भाग होता आणि आहे. निसर्गातल्या घटनांमागची मीमांसा जोवर करणे शक्य नव्हते, त्यामागची कारणे जोवर अज्ञात होती तोवर त्याना परमेश्वराचे स्वरूप देण्यात आले. सजीवत्व हा देखील या कुतुहलाचाच विषय होता. या सजीवत्वाच्या, चेतनेच्याबद्दलच्या चिंतनातूनच "आत्मा" ही संकल्पना अस्तित्वात आली. विसाव्या शतकात जनुकांचा शोध लागेपर्यंत, सजीवत्त्वाचा शोध चालूच होता, मात्र त्याला स्वरूप होते तत्वज्ञानविषयक संकल्पनांचे. जनुकांच्या शोधाने सचेतनत्वाचे कोडे उलगडले आणि काही विशिष्ट परिस्थितीत काही प्रोटीन्स आणि न्युक्लिक अ‍ॅसिड्स या दोन अचेतन रासायनिक द्रव्यांमधून सचेतन जीवसृष्टीची निर्मिती होऊ शकते हे सिद्ध झाले. म्हणजे जडतत्वापासूनच सजीवत्व निर्माण होते हे पुराव्याच्या आधारे सिद्ध झाले. शतकानुशतके विचारांची घुसळण चालू असलेल्या एका अतिशय अ‍ॅबस्ट्रॅक्ट संकल्पनेचे रूपांतर काँक्रीट स्वरूपी सिद्धतेपर्यंत कसा झाला याचा हे पुस्तक वेध घेते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;विषयाची व्याप्ती घेता , पुस्तक २०० पानी म्हणजे अगदीच टीचभर मानायला हवे. मात्र लेखकाने केलेला सम्यक अभ्यास, हे पुस्तक सादर करत असताना नेमके काय मांडायचे आहे याचे त्याने ठेवलेले भान , आणि महत्त्वाच्या टप्प्यांबद्दल , निर्णायक शोधांबद्दल दिलेली नेमकी माहिती या मुळे या प्रदीर्घ प्रवासाच्या नकाशाने आपले काम अचूक बजावलेले आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;हिप्पोक्रीटसच्या शपथेपासून जो प्रवास सुरू होतो तो वेसालिअसच्या पहिल्यावहिल्या शरीरशास्त्रीय अभ्यासाला , दुसर्‍या शतकात गॅलेनने मांडलेल्या रक्ताभिसरणाच्या संकल्पनेला गवसणी घालतो. आणि इथे सगळ्यात आश्चर्यकारक भाग येतो. तिसर्‍या शतकात गॅलनने जी थिअरी मांडली त्यात "शरीरात रक्त वहाते" इतकाच भाग बरोबर होता. बाकी सगळे अंदाजपंचे असल्याने चुकीचेच होते. गॅलनच्या या थिअरीला उलथून लावण्याकरता १६वे शतक उजाडावे लागले ! १६ ते १९वे शतक केवळ अ‍ॅनाटॉमीचा अभ्यास चालू होता. या सगळ्यादरम्यान शवविच्छेदनावरील बंदीमुळे अनेक शतके अंधारातच गेली. त्यानंतर मात्र पाश्चात्य जगतात प्रयोग-नीरीक्षणे-संशोधन- सिद्धांत मांडणी या प्रक्रियेला वेग येत गेला. विल्यम हार्वे, मॉरग्ननी यांनी रक्ताभिसरणाचे रहस्य उलगडले. फर्को नावाच्या जर्मन संशोधकाने पेशीचा सिद्धांत मांडला. सूक्ष्मदर्शक यंत्रे जन्माला आली. लुई पाश्चर ने सूक्ष्मजीवांचे अस्तित्व सप्र्योग सिद्ध केले , रेबीज वरची लस शोधून काढली. क्षयजंतूंवर संशोधन झाले. लिस्टरने निर्जंतुकीकरण शोधल्याने शस्त्रक्रिया विकसित व्हायला महत्त्वाचे वळण मिळाले स्टेथोस्कोप अस्तित्त्वात आले. हे सर्व होता होता वेदनाहरण करणार्‍या क्लोरोफॉर्मचा, पहिल्या इसीजीचा शोध लागला. भौतिकशास्त्रज्ञानी क्ष किरणाअंसारख्या गोष्टींचा शोध लावला. आणि पेनिसिलीन आणि अन्य अँटीबायोटीक्सचे युग अवतरायला , विसावे शतकही उजाडले. फ्रॉईड बाबाने मनोविकारशास्त्रात क्रांती घडवून आणली. मेंडेलसारख्या संशोधकांमुळे आनुवांशिकतेचे रहस्य उलगडण्याला सुरवात झाली आणि जनुकांचे युग अवतरले. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात , डीएने सारख्या संकल्पनांचे अस्तित्त्व सिद्ध झाले आणि ह्युमन जीनोम पर्यंत जेनेटीक एंजिनियरींग येऊन पोचले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;हे सगळे संक्षिप्त आहे, अगदी थोडक्यात आहे, परंतु अत्यंत रोचक रीतीने मांडलेले आहे. अक्षंड परिश्रम, प्रयोग, संशोधनाला आयुष्याचे मिशन बनवून केलेले काम या सार्‍यामुळे आपल्या सर्वांचे जीवनमान वाढायला , आपले आयुष्य वेदनारहित करायला , सुखकर बनवायला कसकशी क्रमाक्रमाने प्रगती झाली हे सारे उत्तम रीतीने मांडलेले आहेच. पण त्याचबरोबर केवळ मनन-चिंतनाच्या पातळीवर असलेल्या सचेतनत्वाच्या संकल्पनेचा प्रवास तत्वज्ञानाचय ग्रंथांमधून , धर्मग्रंथांच्या नि धर्मपीठांच्या कचाट्यातून , प्रयोगशाळॅपर्यंत आणि संशोधनसिद्ध काँक्रिट पुराव्यांपर्यंत कसा झाला हे अतिशय उद्बोधक आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;हे पुस्तक सर्वव्यापी नाही, सगळे आवाक्यात घेणारे नाही. त्याचा तसा दावाही नाही. मात्र हा एक उत्तम आरंभबिंदू आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;शीर्षक : आत्मा ते जनुक&lt;br /&gt;लेखक : डॉ. चंद्रकांत वागळे.&lt;br /&gt;प्रकाशन : पॉप्युलर&lt;br /&gt;पृष्ठे : २२०.&lt;br /&gt;किंमत : रु २१०&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/2301518882851474855-4353378163869433804?l=muktasunit.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://muktasunit.blogspot.com/feeds/4353378163869433804/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=2301518882851474855&amp;postID=4353378163869433804' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2301518882851474855/posts/default/4353378163869433804'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2301518882851474855/posts/default/4353378163869433804'/><link rel='alternate' type='text/html' href='http://muktasunit.blogspot.com/2010/06/blog-post.html' title='&quot;आत्मा ते जनुक&quot;'/><author><name>MuktaSunit</name><uri>http://www.blogger.com/profile/00445626723230179642</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://1.bp.blogspot.com/-vZSy_JeY3tg/Ti7ehA38n5I/AAAAAAAAA6U/xfdKbNO0nnk/s220/rajan.jpg'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-2301518882851474855.post-6895079961312057903</id><published>2010-04-10T07:16:00.001-07:00</published><updated>2010-04-10T07:16:48.252-07:00</updated><title type='text'>"दुष्काळ आवडे सगळ्यांना"</title><content type='html'>".. या पुस्तकातली माणसं म्हणजे भारतीय समाजाच्या एका भल्या मोठ्या हिश्शाचे प्रतिनिधी आहेत. त्यांच्या जीवनावर हुकूमत गाजवणार्‍या लोकसंख्येतलं प्रमाण फक्त १० टक्के आहेत. पण त्यांच्यापेक्षा कितीतरी विशाल अशा या समाजघटकापर्यंत उच्चभ्रूंच्या दृष्टीचा पल्ला पोचत नाही. आणि त्या समाजाशी संबंध तुटलेल्या वृत्तपत्रांची, माध्यमाची झेपही तिथपर्यंत जात नाही."&lt;br /&gt;&lt;br /&gt;हे शब्द आहेत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय पत्रकार, २००७ च्या मॅगसेसे पुरस्काराचे विजेते पी.साईनाथ यांचे. "Everybody loves a good drought" या त्यांच्या पुस्तकाच्या मराठी अनुवादातून वरचा उतारा घेतलेला आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून इतिहास विषयात एम.ए. ही पदवी मिळवल्यानंतर ते १९८० साली युनायटेड न्युज ऑफ इंडीया या वृत्तसंस्थेत वार्ताहर म्हणून रुजू झाले. पुढे "द डेली" या दैनिकात आंतरराष्ट्रीय घडामोडींचे संपादक आणि "द ब्लिट्झ" या साप्ताहिकात उपमुख्य संपादक म्हणून त्यांनी काम पाहिले. १९९३ साली त्यांना भारताच्या ग्रामीण भागातल्या दारिद्र्याचा अभ्यास करण्यासाठी "टाइम्स ऑफ इंडिया"ची शिष्यवृत्ती मिळाली. त्यांनी केलेले हे संशोधन जगभर नावाजले गेले. त्या संशोधनातून जन्माला आलेला रिपोर्ट म्हणजे हे पुस्तक.&lt;br /&gt;&lt;br /&gt;गरीबी आणि विवंचना यांची वर्णने बहुदा घटनेच्या रूपात आपल्यासमोर येतात. म्हणजे एखादी आपत्ती कोसळते , लोक मृत्यू पावतात, तेव्हा. पण गरीबी म्हणजे केवळा भूकबळी किंवा दुष्काळजन्य परिस्थिती नव्हे. अनेक घटनांच्या एकत्रित परिणामातून गरीबी जन्माला येते. त्यात प्रदेश, समाज , संस्कृती यांमधल्या भिन्नतेतून घटकांचं वजन कमी जास्त होतं. पण गाभ्याशी ठराविक घटकच असतात. त्यात उत्पन्न, पोषणद्रव्यं यांचबरोबर , जमीन, आरोग्य, शिक्षण, साक्षरता , बालमृत्यूचं प्रमाण आणि अपेक्षित आयुर्मान यांचाही समावेश होतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;गरीबीकडे एक घटना न पाहता प्रक्रिया म्हणून बघणं हे या पुस्तकांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य. म्हणूनच हे पुस्तक वाचणं हा एक दाहक अनुभव ठरतो.घटना घडून जाते, इतर घटनांच्या मागे दडून जाते. प्रक्रिया सततची असते. ती आहे, हे एकदा मान्य झालं की तिची दखल घेणं हे आवश्यकच ठरतं. गरीबीकडे घटना म्हणून बघताना नेमकं हेच आपण आपल्या नकळत टाळत असतो. प्रस्तुत पुस्तकासारखे दस्तावेज नेमके हेच साधतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;साईनाथ म्हणतात , "गरीबीची व्याख्या, दारिद्र्यरेषा, गरीबीच्या प्रमाणाची वेगवेगळया संदर्भांमधली आकडेवारी या सर्व गोष्टींचे महत्त्व मला मान्य होतेच ; परंतु मला आकड्यांवर नव्हे तर माणासांवर प्रकाश टाकायचा होता. यांचा एकमेकांशी संबंध नाही असे मला बिलकुल म्हणायचे नाही."&lt;br /&gt;&lt;br /&gt;भारतातल्या गरीबांपैकी ४० टक्के भूमीहीन शेतमजूर आहेत. ४५ टक्के अल्पभूधारी शेतकरी आहेत. ७.५ टक्के ग्रामीण कारागीर. बाकीचे "इतर" वर्गातले. साईनाथांचा अभ्यास पहिल्या दोन वर्गांचा आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पुस्तकातल्या विभागांची शीर्षके मोठी मार्मिक आहेत. एकेका विभागामधे एकेका वर्गाची उदाहरणे आहेत. प्रत्येक उदाहरणामधून दिसते अनास्था, धोरणांचा ढिसाळपणा, अंमलबजावणीचा अभाव , आरोग्य सेवेच्या नावाने चालवली गेलेली चेष्टा , हिवतापासारख्या रोगांमधे सतत होत असलेली वाढ, शिक्षणाच्या निधीचे गायब होणे. एक आख्खा विभाग आहे "विकास प्रकल्पांच्या" बळींचे. राहत्या घरातून , कसत्या जमिनीतून उचकटले गेलेल्यांचा लेखाजोखा. जंगलांची, पाना-वृक्षांच्या नाशाचे एकेक अध्याय. जर का भ्रष्ट , हावरट यंत्रणेकडून काही शिल्लक राहिलेले असेल तर उरलेल्यातून जी अंमलबजावणी होते त्यामधे निर्बुद्धपणा नि अनास्था यांचे भीषण मिश्रण आढळते. या अशा अंमलबजावणीतून गुराढोरांच्या जातीप्रजातीपासून, जंगलांपर्यंतचा नष्टांश आणि नको असलेल्या रस्त्यांपासून भलत्याच ठिकाणी कुपोषिताना दिल्या गेलेल्या सायकलींपर्यंतच्या कहाण्या.&lt;br /&gt;&lt;br /&gt;कल्याणकारी योजना म्हणजे तर पळवाटीचे डावपेचच. जनतेला जेव्हा जमीनसुधारणा देता येत नाही तेव्हा संकरित गायी दिल्या जातात (ज्यांच्या प्रजाती लवकरच मरतात) शिक्षणाकरता शाळा देता येत नाहीत तेव्हा "पठडीबाहेरच्या" शिक्षणाचे प्रयोग केले जातात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;लक्षांत घ्या. हे सर्व किस्से नव्हेत. कथा नव्हेत. एका माणसाने दुर्गम भागांमधे जाऊन, प्रत्यक्ष लोकांना भेटून, त्याकरता सुमारे १ लाख किलोमिटरचा प्रवास चार वर्षे करून हा अहवाल बनवलेला आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पुस्तकाच्या शेवटचा उपसंहार डोळ्यांमधे झणझणीत अंजन घालणारा आहे. "पंधरा टक्क्यांनी मिळून केलेली पंचाऐंशी टक्केवाल्यांची फसवणूक" इतक्या परिणामकारकरीत्या क्वचित मांडली गेली असेल. हे सर्व लिहिताना साईनाथ कुठे भडक होत नाहीत. जे सांगायचे आहे त्याकरता छद्माचा आधार त्याना घ्यावा लागत नाही. जे आहे ते समोर आहे. प्रत्यक्ष उदाहरणे आहेत. दाखले आहेत. निव्वळ आकडेवारी नव्हे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;एका माणसाने एकहाती केलेले हे काम छाती दडपून टाकणारे. आज साईनाथ यांची प्रतिमा म्हणजे, भारतातल्या विवेकाचा आवाज अशी आहे. आंतरराष्ट्रीय प्रकाशनांमधे आणि परीषदांमधे त्यांना आमंत्रण असते , लिखाण चालू असते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;अशा या दस्तावेजाला मराठीमधे आणल्याबद्दल आपण हेमंत कर्णिकांचे ऋणी असायला हवे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"दुष्काळ आवडे सर्वांना"&lt;br /&gt;मूळ लेखक : पी. साईनाथ.&lt;br /&gt;अनुवाद : हेमंत कर्णिक&lt;br /&gt;अक्षर प्रकाशन&lt;br /&gt;किंमत ३००/- रुपये.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पी साईनाथ विकी : http://en.wikipedia.org/wiki/Palagummi_Sainath&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/2301518882851474855-6895079961312057903?l=muktasunit.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://muktasunit.blogspot.com/feeds/6895079961312057903/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=2301518882851474855&amp;postID=6895079961312057903' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2301518882851474855/posts/default/6895079961312057903'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2301518882851474855/posts/default/6895079961312057903'/><link rel='alternate' type='text/html' href='http://muktasunit.blogspot.com/2010/04/blog-post.html' title='&quot;दुष्काळ आवडे सगळ्यांना&quot;'/><author><name>MuktaSunit</name><uri>http://www.blogger.com/profile/00445626723230179642</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://1.bp.blogspot.com/-vZSy_JeY3tg/Ti7ehA38n5I/AAAAAAAAA6U/xfdKbNO0nnk/s220/rajan.jpg'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-2301518882851474855.post-290432275120485026</id><published>2009-06-01T19:55:00.000-07:00</published><updated>2009-06-01T19:56:13.204-07:00</updated><title type='text'>"दसविदानिया"</title><content type='html'>&lt;strong&gt;डिस्क्लेमर &lt;/strong&gt;: पुढील काही परिच्छेदांत , चित्रपटाच्या कथानकादि घटकांबद्द्ल माहिती आहे. ज्यांना त्याबद्दल वाचायचे टाळायचे असेल त्यांनी वाचू नये. &lt;br /&gt;&lt;br /&gt;तर , चित्रपटाच्या ह्या गमतीशीर नावामागे आहे "दो स्विदानिया" या , रशियन वाक्प्रचारावरील श्लेष. "दो स्विदानिया" म्हणजे भेटीअंती निरोप घ्यायचे शब्द :" गुड् बाय्" या अर्थी. "कॅन्सरने अकाली मरू घातलेल्या एका पस्तीशीच्या अविवाहित माणसाने , आपल्या शेवटच्या दिवसांत बनवलेली कामांची यादी आणि त्या कामांची पूर्तता" अशा एका ढोबळ कथासूत्रात चित्रपटाचे सार सामावते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;अर्थातच , विनय पाठक या नटाने केलेली "अमर कौल" ही या सिनेमातली मध्यवर्ती भूमिका. या नटाबद्दल , त्याने केलेल्या आधीच्या कामांमुळे विलक्षण कुतूहल आणि आदर वाटत् होताच. माझ्यापुरते म्हणायचे तर या चित्रपटाकरता , त्याने आपले सर्व कौशल्य म्हणा , अभिनयाची जाण म्हणा , एकूण जगण्याबद्दलचे भान म्हणा या सर्वांतील उत्कृष्ट म्हणता येईल ते पणास लावले , या भूमिकेचे सोने केले असे मी म्हणेन. &lt;br /&gt;&lt;br /&gt;मृत्यूविषयक चिंतन , "मरणात खरोखर जग जगते" , "मृत्यूस कोणी हासे , मृत्यूत कोणी हासे" वगैरे वगैरे वचने या सर्व गोष्टी खरे तर नवीन नाहीत. खुद्द हिंदी चित्रपटांत सुद्धा , मृत्यूविषयक चित्रपट कमी नाहीत. दिलीप कुमार पासून शारुख खान पर्यंत , ऐन तारुण्यात मरणारे नायक आपण पाहिलेत. "आनंद" सारख्या चित्रपटावर कुसुमाग्रजांसारख्या मातबर कवीला एक चिंतनगर्भ नाटक लिहावेसे वाटले. "दसविदानिया" या परंपरेतला असेही एका अर्थाने म्हणता येईल. &lt;br /&gt;&lt;br /&gt;मात्र , यातला नायक , कुठल्याही उत्तुंग शोकांकितेत शोभावा असा नाही. त्याच्याकडे ट्रॅजेडी किंगचा रुबाब नाही , सत्तरीमधल्या सुपरस्टारचा करिष्मा नाही , शारुख खान सारखा शेकडो कोटींचा वायदा हा चित्रपट स्वप्नात करत नाही. नायकाचे दिसणे , त्याचे कर्तृत्व , मृत्युची सावली पडायच्या आधीचा त्याचा जीवनविषयक दृष्टीकोन , इतरांना त्याच्याविषयी - इतरांनाच काय , त्याला स्वतःलासुद्धा - त्याच्याविषयी फार आदर , प्रेम , दरारा असे काहीच वाटत नाही. मात्र , मर्ढेकरांच्या कवितेतली "तू एक मुंगी , मी एक मुंगी" मृत्यूच्या छायेत वावरताना , अचानक संपत आलेल्या जीवनरसाच्या शेवटच्या थेंबाना पीताना , मुक्ताबाईच्या "मुंगी उडाली आकाशी" शी , क्षणैक का होईना , पण नाते सांगून जाते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;स्वतःला जपून असलेला हा माणूस शेवटच्या दिवसांमधे गिटार शिकतो , मोटार घेतो , नोकरीला लाथ मारतो (आणि नोकरीला लाथ मारताना संवेदनाहीन बॉसलाही) हेसगळे तर ठीकच. पण त्याचबरोबर महत्त्वाचे म्हणजे , अशा अनेक गोष्टी करतो , ज्या एरवी स्वभावजन्य भीड , "इन्फेरियॉरिटी कॉम्प्लेक्स्"मुळे त्याने केल्या नसत्या. उदाहरणार्थ , जिच्यावर बालपणापासून प्रेम केले, त्या , आता एका मुलीची आई झालेल्या आपल्या मैत्रीणीला तो सांगतो की , "तुझे आताचे आयुष्य दृष्ट लागण्यासारखे सुंदर आहे खरे ; पण मी मात्र तुझ्यावर प्रेम केले - अगदी लहानपणापासून." आणि एखादी लढाई जिंकल्याच्या आनंदात पावसात निघून जातो. आपल्या एकेकाळच्या जीवलग मित्राला १२ वर्षांनी भेटण्याकरता रशियाला त्याच्या आलिशान घरी जातो . त्याच्या बायकोला वाटते , हा फुकट ट्रीटमेंट मागायला आलाय. तर तो कुणावरही न चिडता शांतपणे त्या घराबाहेर पडतो . नंतर आपल्या त्याच मित्राला अगदी शांतपणे सांगतो : "तुला भेटायचे होते , ते भेटलो. याहून काही नको होते. तुझ्या बायकोला भेटण्याइतका आता वेळ नाही , तिलाही माझा नमस्कार सांग"&lt;br /&gt;&lt;br /&gt;माझ्या दृष्टीने , जर या चित्रपटाचे काही यश असेल तर , ते हेच की , अरे , लिस्टा बनवायच्या तर "गीझर दुरुस्त करायचाय्" , "ऑफिसात अमुक रिपोर्ट् अमुक तारखेपावेतो द्यायचाच आहे" असल्या गोष्टींचाच नका करू फक्त. हेच करत रहायचे असेल तर मग आणखी ४ महिने जगलो काय आणि ४० वर्षे जगलो काय , काय फरक पडतो ? "या जन्मावर , या जगण्यावर शतदा प्रेम करावे" या ओळी ऐकून ऐकून जर सवयीच्या होत असतील आणि आपण काडेचिराईताचे आयुष्य सोडणार नसू , तर काय उपयोग आहे या ओळींचा ?&lt;br /&gt;&lt;br /&gt;हे झाले चित्रपटाच्या अस्तिपक्षी. काही गोष्टी टाळता आल्या असत्या. मुद्दाम रडू आणण्याचा प्रयत्न केलेले ("टीअर जर्कींग्") काही प्रसंग , रशियात , मित्राच्या घराबाहेर पडल्यावर एका वेश्येबरोबर घालवलेला काळ , तिने त्याला निराशेपोटी करत असलेल्या आत्महत्येपासून परावृत्त करणे इ. इ. भाग अतिरंजित वाटू शकतो. मात्र एकूण पटकथेचे हलकेफुलके , सहज स्वरूप , पाठकसकट सगळ्यांनी केलेला अभिनय , मृत्युविषयक भाष्याला कठोपनिषद-सदृष् अतिगंभीर , किंवा सामुदायिक हंबरडेवजा स्वरूप देण्याचे टाळून , त्यातल्या विसंगतींना नर्म विनोदाच्या शिडकाव्याने रंगविणे यामुळे , एकूण सकारात्मक बाबींचे पारडे माझ्या हिशेबाने जड ठरले.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/2301518882851474855-290432275120485026?l=muktasunit.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://muktasunit.blogspot.com/feeds/290432275120485026/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=2301518882851474855&amp;postID=290432275120485026' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2301518882851474855/posts/default/290432275120485026'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2301518882851474855/posts/default/290432275120485026'/><link rel='alternate' type='text/html' href='http://muktasunit.blogspot.com/2009/06/blog-post.html' title='&quot;दसविदानिया&quot;'/><author><name>MuktaSunit</name><uri>http://www.blogger.com/profile/00445626723230179642</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://1.bp.blogspot.com/-vZSy_JeY3tg/Ti7ehA38n5I/AAAAAAAAA6U/xfdKbNO0nnk/s220/rajan.jpg'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-2301518882851474855.post-1907679206090201283</id><published>2009-04-19T12:11:00.000-07:00</published><updated>2009-04-19T12:14:10.875-07:00</updated><title type='text'>"लक बाय चान्स"</title><content type='html'>हा चित्रपट येऊन काही महिने उलटले तरी पहाण्याचा योग कालपर्यंत आला नव्हता. अनेक चित्रपट पाहिले जातात पण थोडेसेच लिहिण्यासारखे असतात. "लक बाय चान्स" हा त्यापैकी एक. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;डिस्क्लेमर &lt;/strong&gt;: पुढील काही परिच्छेदांत , चित्रपटाच्या कथानकादि घटकांबद्द्ल माहिती आहे. ज्यांना त्याबद्दल वाचायचे टाळायचे असेल त्यांनी वाचू नये. &lt;br /&gt;&lt;br /&gt;हा चित्रपट एका होतकरू , चित्रपट-नायक बनू पहाणार्‍या तरुणाच्या - "स्ट्रगल"च्या दिवसांची कहाणी रेखाटतो. एका बिनचेहर्‍याच्या , बिननावाच्या अस्तित्त्वापासून पदार्पणाच्या यशापर्यंत त्याचा प्रवास कसा घडतो आणि या प्रवासादरम्यान त्याचे त्याच्या आजूबाजूच्या लोकांशी नाते कसे घडते ? हे झाले स्थूलमानाने कथानक. या सगळ्या नात्यांमधे त्याचे सगळ्यात महत्त्वाचे नाते (अर्थातच) त्याचे प्रेमपात्र असलेल्या , जवळजवळ त्याच्याइतक्याच नवी असलेल्या मुलीबरोबरचे. चित्रपटात असे वळण येते की चित्रपट या नायकाचा म्हणून सुरू तर होतो ; पण त्याच्या या प्रेयसीचा बघता बघता होऊन जातो .... मला वाटते , कथानक याच्यापेक्षा सांगणे अयोग्य होईल. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;कथानक पूर्ण&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;चित्रपटाची संकल्पना आणि दिग्दर्शन आहे झोया अख्तरचे. झोया म्हणजे जावेदसाबांची मुलगी आणि फरहानची बहीण. सिनेमाचा नायक आहे फरहान आणि नायिका आहे कोंकोणा सेन.&lt;br /&gt;झोयाबाईना हा चित्रपट सुचला सुमारे ७ वर्षांपूर्वी. या संकल्पनेला प्रत्यक्षात यायला इतकी वर्षे गेली. दरम्यानच्या काळात नायक-नायिका बदलत गेल्या. शेवटी फरहान-कोंकोणा यांनी हा चित्रपट केला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;तर अशा या चित्रपटाबद्दल मुद्दामहून लिहावे असे काय ? तर अर्थातच , चित्रपटाची , कथानकाची हाताळणी. &lt;br /&gt;&lt;br /&gt;सर्वप्रथम सांगायचे तर हा चित्रपट पहाणे हा अतिशय आनंददायक अनुभव बनला , याचे कारण , चित्रपटाच्या टायटल्स पासून शेवटच्या प्रसंगा-फ्रेम पर्यंत जपलेली अर्थपूर्णता. (सटल्टी ला योग्य मराठी शब्द काय ?) हिंदी चित्रपट बर्‍याचदा गाळून गाळून पहावा लागतो. अर्थहीन तण कापत कापत. इथे म्हणजे प्रत्येक प्रसंग आस्वाद घ्यावा असा. &lt;br /&gt;&lt;br /&gt;या चित्रपटाचा एक अतिशय महत्त्वाचा पैलू म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीबद्दल केलेली ही एक टिप्पणी आहे. आणि ही टिप्पणी आहे अर्थातच , नर्मविनोदी. इथल्या माणसांमधल्या , त्यांच्या व्यवहारांमधल्या विसंगती, स्पर्धा, स्वार्थ , असूया , खोटेपणा , यशापयश, नातेसंबंध, त्या संबंधांमधला तात्पुरतेपणा इ. इ. बद्दलची टिप्पणी. आणि यात कुठेही , भडक, बटबटीतपणाचा स्पर्श नाही. म्हणजे , प्रसंगी माणसे बटबटीत वागतात, ढोंगीपणा दाखवतात ; पण त्याचे चित्रण मात्र अगदी अलगदपणे केलेले आहे. किंवा एरवी ढोंगी , बटबटीत वागणार्‍या कुणाचे ठसठसते दु:ख कधीकधी व्यक्त होते. या चित्रपटाचा मला सगळ्यात आवडलेला पैलू म्हणजे , ही नजाकत. अशा छोट्या छोट्या क्षणांना शब्दबंबाळपणा किंवा आचरटपणा यांचा शाप नाही. &lt;br /&gt;&lt;br /&gt;चित्रपटात उपरोक्त सर्वात महत्त्वाच्या दोन पात्रांशिवाय अक्षरशः डझनावारी पात्रे आहेत. ऋषि कपूर, डिंपल , जुही चावला , संजय कपूर , हृतिक रोशन आणि नवतारका इशा श्रावणी यांच्या भूमिका या दोघांच्या खालोखाल महत्त्वाच्या. यांच्या व्यतिरिक्त शाहरुखखान पासून आमीर खान पर्यंत आणि करीनाकपूर पासून बोमन इराणी पर्यंत अनेकानेक लोकांची एकेका प्रसंगापुरती हजेरी आहे. या सार्‍यांना "ओम शांति ओम" सारखे , एकाच लांबच लांब गाण्यात गुंफण्यापुरते आणलेले नाही , तर या सर्वांच्या प्रसंगांना चित्रपटाच्या "थीम" च्या संदर्भात अर्थपूर्ण स्थान आहे. या मोठ्या मोठ्या स्टार्स च्या "कॅमीओज" इतकेच महत्त्वाचे आहेत अनेक इतर , अनोळखी सहकलाकारांचे छोटे छोटे प्रसंग. मग ती एखादी नायिकेची मैत्रीण असो , नायकाचे मित्र असोत , कुणाचे पी ए असोत , एखादी नृत्यदिग्दर्शिका असो ... कोणाच्याही छोट्याशा संवादामधे आनंद घेण्यासारखे , काहीतरी नर्मविनोदी किंवा अर्थपूर्ण असे काहीतरी आहेच. सगळ्यांना आपल्या मिळालेल्या तुकड्याचे चीज करायला मिळाले आहे. संजय कपूर , ऋषि कपूर यांना माझ्या मनात फार मोठे अभिनेते म्हणून स्थान नव्हते. मात्र या चित्रपटात त्यांना मिळालेल्या महत्त्वाच्या भूमिकेत ते फिट्ट बसतात , त्यांना मिळालेले प्रसंग खरोखरच एंजॉय करण्यासारखे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;अर्थात , उपरोल्लेखित वास्तववादी चित्रण , किंवा अर्थपूर्ण हाताळणी हाच काही या चित्रपटाचा एकमेव मानबिंदू नव्हे. किंबहुना , त्याच्याइतकेच महत्त्वाचे आहेत काही असे चर्चिलेले मुद्दे जे कथानकाच्या ओघाने येत रहातात. हे मुद्दे जुने आहेत - जसे , "तकदीर की तदबीर ?" म्हणजेच , "नशीब की कर्तृत्व ?" किंवा " फेट् की चॉइस?" . मात्र चित्रपटात चितारलेल्या एकूण अनिश्चिततेच्या , उमेदवारीच्या , जीवघेण्या स्पर्धेच्या चित्रणात , एकूण कथानकात हे प्रश्न अलगदपणे गोवले जातात . म्हणूनच अर्थपूर्ण वाटतात. &lt;br /&gt;&lt;br /&gt;जवळजवळ सगळा चित्रपट नायकाच्या पर्स्पेक्टीव्हने मांडला जातो. मात्र शेवटच्या प्रसंगात नायिकेचा नि नायकाचा जो संवाद होतो तो प्रसंग सोन्याचा. त्या एका प्रसंगाने नायिकेच्या पात्राला एका निराळ्य प्रतलावर नेऊन ठेवतो - आणि चित्रपटाच्या एकंदर परिणामालाही. &lt;br /&gt;&lt;br /&gt;कोंकोणा सेन आणि फरहान अख्तर दोघांचीही कामे उत्तम यात वेगळे सांगायला नको. मात्र शेवटी काहीही झाले तरी हा चित्रपट झोया अख्तरचा आहे. चित्रपटाच्या संकल्पनेपासून एकेका फ्रेमवर तिचे गोंदण उमटलेले आहे. आणि एकेक पैलू निरखून पारखून घेतलेला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;इतके सगळे गुणगान गाइल्यावर अर्थातच काही न आवडलेले रहातेच. काही बाबींवर अगदी काहीच इलाज नाही. उदा. फरहान अख्तरचा आवाज. या नटाचा पडद्यावरचा वावर एकदम जबर. पण तो बोलायला लागतो आणि अर्रर्रर्रर्र.... आपण हुकतो एकदम. एखाद दोन गाणी टाळली असती तर बरे झाले असते. त्या गाण्यांच्या चालींमधेही फार काही लक्षात ठेवण्यासारखे नाही. आणि माझे चुकत नसेल तर कोंकोणाताई अंमळ "खात्या-पित्या घरच्या" दिसतात. ( यात काही चूक आहे असे नाही ; पण मला व्यक्तिशः थोडे खटकले खरे. ) &lt;br /&gt;&lt;br /&gt;असो. हा चित्रपट मला आवडला. तुम्हाला आवडेल याची शाश्वती नाही. पण कुणी पाहिला असल्यास त्यांच्या मताशी ताडून पहायला नक्की आवडेल.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/2301518882851474855-1907679206090201283?l=muktasunit.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://muktasunit.blogspot.com/feeds/1907679206090201283/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=2301518882851474855&amp;postID=1907679206090201283' title='4 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2301518882851474855/posts/default/1907679206090201283'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2301518882851474855/posts/default/1907679206090201283'/><link rel='alternate' type='text/html' href='http://muktasunit.blogspot.com/2009/04/blog-post.html' title='&quot;लक बाय चान्स&quot;'/><author><name>MuktaSunit</name><uri>http://www.blogger.com/profile/00445626723230179642</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://1.bp.blogspot.com/-vZSy_JeY3tg/Ti7ehA38n5I/AAAAAAAAA6U/xfdKbNO0nnk/s220/rajan.jpg'/></author><thr:total>4</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-2301518882851474855.post-9116868736168640452</id><published>2008-12-09T20:41:00.001-08:00</published><updated>2008-12-09T20:43:32.209-08:00</updated><title type='text'>बुकोव्स्की यांच्या एका कवितेचा अनुवाद</title><content type='html'>An Almost Made Up Poem:&lt;br /&gt;see you drinking at a fountain with tiny&lt;br /&gt;blue hands, no, your hands are not tiny&lt;br /&gt;they are small, and the fountain is in France&lt;br /&gt;where you wrote me that last letter and&lt;br /&gt;I answered and never heard from you again.&lt;br /&gt;you used to write insane poems about&lt;br /&gt;ANGELS AND GOD, all in upper case, and you&lt;br /&gt;knew famous artists and most of them&lt;br /&gt;were your lovers, and I wrote back, it’ all right,&lt;br /&gt;go ahead, enter their lives, I’ not jealous&lt;br /&gt;because we’ never met. we got close once in&lt;br /&gt;New Orleans, one half block, but never met, never&lt;br /&gt;touched. so you went with the famous and wrote&lt;br /&gt;about the famous, and, of course, what you found out&lt;br /&gt;is that the famous are worried about&lt;br /&gt;their fame –– not the beautiful young girl in bed&lt;br /&gt;with them, who gives them that, and then awakens&lt;br /&gt;in the morning to write upper case poems about&lt;br /&gt;ANGELS AND GOD. we know God is dead, they’ told&lt;br /&gt;us, but listening to you I wasn’ sure. maybe&lt;br /&gt;it was the upper case. you were one of the&lt;br /&gt;best female poets and I told the publishers,&lt;br /&gt;editors, “ her, print her, she’ mad but she’&lt;br /&gt;magic. there’ no lie in her fire.” I loved you&lt;br /&gt;like a man loves a woman he never touches, only&lt;br /&gt;writes to, keeps little photographs of. I would have&lt;br /&gt;loved you more if I had sat in a small room rolling a&lt;br /&gt;cigarette and listened to you piss in the bathroom,&lt;br /&gt;but that didn’ happen. your letters got sadder.&lt;br /&gt;your lovers betrayed you. kid, I wrote back, all&lt;br /&gt;lovers betray. it didn’ help. you said&lt;br /&gt;you had a crying bench and it was by a bridge and&lt;br /&gt;the bridge was over a river and you sat on the crying&lt;br /&gt;bench every night and wept for the lovers who had&lt;br /&gt;hurt and forgotten you. I wrote back but never&lt;br /&gt;heard again. a friend wrote me of your suicide&lt;br /&gt;3 or 4 months after it happened. if I had met you&lt;br /&gt;I would probably have been unfair to you or you&lt;br /&gt;to me. it was best like this. &lt;br /&gt;&lt;br /&gt;Charles Bukowski&lt;br /&gt;&lt;br /&gt;बुकोव्स्की यांची क्षमा मागून केलेले माझे भाषांतर : &lt;br /&gt;&lt;br /&gt;त्या कारंज्यापाशी पीत बसलेली तुला नेहमी पहाणारा मी&lt;br /&gt;निळसर, इवल्याशा हातांची तू, नाही तुझे हात इवले नाहीत,&lt;br /&gt;पण होते छोटेच; आणि तो कारंजाही फ्रान्समधला&lt;br /&gt;जिथून तू लिहीले मला तुझे शेवटचे पत्र आणि&lt;br /&gt;मी उत्तर लिहीले आणि त्यावर मला कधीच काही कळले नाही तुझ्याकडून.&lt;br /&gt;जाड , ढोबळ शब्दांत खुळ्या कविता लिहायचीस तू&lt;br /&gt;देव नि त्याच्या दूतांबद्दल; सगळ्या बड्या कलावंताना ओळखायचीस&lt;br /&gt;नि त्यातले जवळजवळ सगळे तुझे आशक. मी लिहीले, ठीक आहे बाई,&lt;br /&gt;जा त्यांच्या मागे. मी कशाला जळू - नाहीतरी भेटलोय कुठे कधी आपण.&lt;br /&gt;जास्तीत जास्त जवळ आलो होतो न्यू ऑर्लीन्समधे , अर्ध्या रस्त्यावर होतो&lt;br /&gt;एकमेकांच्या ; पण भेट नाही , स्पर्श नाही. त्यामुळे तू त्या बड्यांबरोबर गेलीस&lt;br /&gt;नि बड्यांबद्दल लिहीत राहिलीस , आणि अर्थातच , तुला कळले होते एव्हाना&lt;br /&gt;की मोठ्या लोकांना पर्वा असते आपल्या प्रसिद्धीबद्दलच,&lt;br /&gt;पण त्याना शय्येमधे "ते" देणार्‍या आणि सकाळी उठून&lt;br /&gt;जाड , ढोबळ शब्दांत देव नि त्याच्या दूतांबद्दल खुळ्या कविता लिहीणार्‍या&lt;br /&gt;सुंदर, तरुण मुलीबद्दल त्याना काहीही देणेघेणे नाही.&lt;br /&gt;देव मेलाय, आपल्या सगळ्याना तर ते ठाऊकच आहे. पण&lt;br /&gt;तुझ्या कविता वाचून वाटायचे - कुणास ठाऊक ? कदाचित&lt;br /&gt;त्या जाड ढोबळ शब्दांमुळे असेल, तू सर्वोत्तम कवयत्रींपैकी वाटायचीस&lt;br /&gt;म्हणून मी प्रकाशकांना सांगितले : "तिच्या , तिच्या कविता छापा.&lt;br /&gt;ती वेडी असेल पण तिच्यात जादू आहे. आणि तिच्यातल्या निखार्‍यांमधे&lt;br /&gt;कसलेच नाही हीण." एखाद्या स्त्रीवर केवळ पत्रांवाटे ,&lt;br /&gt;तिचे छोटेसे फोटो खिशात बाळगून, अस्पर्श प्रेम करणार्‍या&lt;br /&gt;प्रियकराप्रमाणे होतो मी. कदाचित आपण एकाच खोलीत असताना मी&lt;br /&gt;सिगारेट्स हुंगत बसताना नि बाजूच्या बाथरूममधून तुझ्या&lt;br /&gt;लघवीचा आवाज ऐकताना कदाचित मी तुझ्यावर&lt;br /&gt;आतापेक्षा जास्त प्रेम केलेही असते. पण ते व्हायचे नव्हते.&lt;br /&gt;तुझ्या पत्रांचा सूर आर्त होत गेला - तुझ्या सर्व आशकानी तुला फसवले होते.&lt;br /&gt;पोरी , मी लिहीले , सर्वच आशक फसवणूक करतात.&lt;br /&gt;त्याचा काही उपयोग नाही झाला . तू म्हणालीस तुझा एक रडण्याचा बाक होता,&lt;br /&gt;एका पूला शेजारी नि तो पूल होता नदीवर आणि तू त्या बाकावर रोज रात्री&lt;br /&gt;तुला दुखावणार्‍या नि विसरून गेलेल्या आशकांबद्दल शोक करत बसायचीस.&lt;br /&gt;मी उत्तर लिहीले पण नंतर तुझी उत्तरे थांबली.&lt;br /&gt;तुझ्या आत्महत्येनंतर तीन-चार महिन्यानी&lt;br /&gt;एका मित्राने त्याबद्दल मला कळवले. जर आपण भेटलो असतो&lt;br /&gt;तरी मी तुला नि तू मला न्याय दिला नसताच. त्यामुळे जे झाले तेच उत्तम .&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/2301518882851474855-9116868736168640452?l=muktasunit.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://muktasunit.blogspot.com/feeds/9116868736168640452/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=2301518882851474855&amp;postID=9116868736168640452' title='3 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2301518882851474855/posts/default/9116868736168640452'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2301518882851474855/posts/default/9116868736168640452'/><link rel='alternate' type='text/html' href='http://muktasunit.blogspot.com/2008/12/blog-post_721.html' title='बुकोव्स्की यांच्या एका कवितेचा अनुवाद'/><author><name>MuktaSunit</name><uri>http://www.blogger.com/profile/00445626723230179642</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://1.bp.blogspot.com/-vZSy_JeY3tg/Ti7ehA38n5I/AAAAAAAAA6U/xfdKbNO0nnk/s220/rajan.jpg'/></author><thr:total>3</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-2301518882851474855.post-4393152670124460419</id><published>2008-12-09T20:22:00.000-08:00</published><updated>2008-12-09T20:40:14.838-08:00</updated><title type='text'>एका  इंग्रजी कवितेचे भाषांतर</title><content type='html'>खूप पूर्वी एक कविता नेटावर वाचली होती. तिचे हे भाषांतर. मूळ कवितेच्या कवीचे नाव "शेल्टन" असे आहे. केरळमधला एक माणूस.&lt;br /&gt;&lt;br /&gt;कविता मला खूप आवडली होती - अजूनही खूप आवडते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;In the dimly lit&lt;br /&gt;dusty corner of the office&lt;br /&gt;a slim arrogant cigarette sits&lt;br /&gt;contently smoking John.&lt;br /&gt;Beyond the Alps,&lt;br /&gt;a sleepy village awakens to the&lt;br /&gt;sounds of an aimless football&lt;br /&gt;kicking around a bunch of schoolboys.&lt;br /&gt;On the merciless, mine-studded&lt;br /&gt;streets of Kandahar, a piece of&lt;br /&gt;American bread eats&lt;br /&gt;starving, veiled women.&lt;br /&gt;In distant cities,&lt;br /&gt;books read scholars&lt;br /&gt;bikes ride punks&lt;br /&gt;films watch viewers&lt;br /&gt;groceries buy shoppers&lt;br /&gt;pianos play prodigies&lt;br /&gt;pictures paint artists&lt;br /&gt;bikinis wear babes&lt;br /&gt;fires light arsonists&lt;br /&gt;mountains climb daredevils&lt;br /&gt;love makes couples&lt;br /&gt;islands discover explorers&lt;br /&gt;and the dead speak well of mourners.&lt;br /&gt;While on a crowded train&lt;br /&gt;speeding past coconut groves,&lt;br /&gt;a stupid poem writes me.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;ऑफिसच्या मंद उजेडात&lt;br /&gt;एका धुळकट कोपर्‍यात&lt;br /&gt;एक बारकीशी सिगारेट&lt;br /&gt;पीत बसली आहे जॉनला&lt;br /&gt;निवांतपणे.&lt;br /&gt;तिकडे आल्प्स पर्वतापलिकडे&lt;br /&gt;एक झोपाळलेले खेडे हळुहळू उठते आहे&lt;br /&gt;शाळकरी पोरांना लाथाडणार्‍या&lt;br /&gt;एका दिशाहीन फुटबॉलच्या आवाजात.&lt;br /&gt;कंदाहारमधल्या क्रूर रस्त्यांवर&lt;br /&gt;अमेरिकन ब्रेडचा तुकडा चघळतो आहे&lt;br /&gt;बुरख्यातल्या एका भुकेल्या बाईला.&lt;br /&gt;दूरदूरच्या नगरांमधे&lt;br /&gt;पुस्तके वाचताहेत विद्वानांना&lt;br /&gt;मोटारबाईक्स चालवताहेत आवारा लोकांना&lt;br /&gt;सिनेमे बघताहेत प्रेक्षकांना&lt;br /&gt;दुकाने खरीदताएत ग्राहकांना&lt;br /&gt;पियानो वाजवताएत वादकांना&lt;br /&gt;चित्रे काढत आहेत कलाकारांना&lt;br /&gt;बिकिनीज घालताएत टंच पोरींना&lt;br /&gt;आगी भडकवताएत घातपाती लोकांना&lt;br /&gt;पर्वत चढताएत साहसवीरांना&lt;br /&gt;प्रणय करतो आहे युगुलांना&lt;br /&gt;बेटे शोधताहेत दर्यावर्दींना&lt;br /&gt;मृतात्मे श्रद्धांजली वाहताएत शोककर्त्यांना.&lt;br /&gt;&lt;br /&gt;... जेव्हा नारळीच्या बागांतून पळणार्‍या&lt;br /&gt;एका गच्च भरलेल्या आगगाडीत&lt;br /&gt;एक वेडी कविता लिहीते आहे मला.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/2301518882851474855-4393152670124460419?l=muktasunit.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://muktasunit.blogspot.com/feeds/4393152670124460419/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=2301518882851474855&amp;postID=4393152670124460419' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2301518882851474855/posts/default/4393152670124460419'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2301518882851474855/posts/default/4393152670124460419'/><link rel='alternate' type='text/html' href='http://muktasunit.blogspot.com/2008/12/blog-post_3060.html' title='एका  इंग्रजी कवितेचे भाषांतर'/><author><name>MuktaSunit</name><uri>http://www.blogger.com/profile/00445626723230179642</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://1.bp.blogspot.com/-vZSy_JeY3tg/Ti7ehA38n5I/AAAAAAAAA6U/xfdKbNO0nnk/s220/rajan.jpg'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-2301518882851474855.post-5119806397402641196</id><published>2008-12-09T20:15:00.000-08:00</published><updated>2008-12-09T20:30:46.490-08:00</updated><title type='text'>"चैत्र"</title><content type='html'>कै. जी ए कुलकर्णी हे नाव मराठी वाचकांना एक महत्त्वाचे कथालेखक म्हणून चांगले परिचित आहे. त्यांनी लिहीलेल्या सुमारे शंभरेक मराठी कथा हा , आजही वाचक आणि अभ्यासकांकरता वाचनाचा , चिंतनाचा , अभ्यासाचा, विषय आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;जीएंनी त्यांच्या सुरवातीच्या काळात लिहिलेली एक कथा म्हणजे "चैत्र". या कथेवर बनविलेला एक छोटासा चित्रपट बघण्याचा योग अलिकडे आला. या चित्रपटाबद्दल थोडे आपल्या मित्रमैत्रिणिंना सांगावे म्हणून या लिखाणाचा प्रपंच. सुरवातीला मूळ कथेबद्दल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पुढील परिच्छेदांमधे आणि त्यानंतरच्या विवेचनामधे कथानक आणि त्याचे प्रमुख धागेदोरे उघड करत आहे. ज्याना हा चित्रपट पहायचा असेल आणि पहाताना रसभंग होऊ द्यायचा नसेल त्यानी वाचू नये.&lt;br /&gt;&lt;br /&gt;जीएंच्या , प्रसंगी लघुकादंबर्‍यांइतक्या मोठ्या आकाराच्या आणि खोलीच्या कथांच्या मानाने ही कथा खूपच छोटी आहे. आधी म्हण्टल्याप्रमाणे, कथालेखक म्हणून आपल्या संपूर्ण शक्तिनिशी लिहिण्याचा काळ अजून यायचा होता. त्या काळातली ही कथा. आयुष्यभर आपल्या लिखाणातून जी एंनी आपल्या आयुष्याबद्दल, त्याच्या अर्थाबद्दल , माणूस म्हणून जगताना भोगाव्या लागलेल्या दु:ख-वेदनांबद्दल लिहीले. लेखक म्हणून सुरवातीच्या काही वर्षांनंतर त्यांच्या कथांचे स्वरूप गुंतागुंतीचे होत गेले, त्यातील दु:खाच्या छटा जास्त जास्त गडद होत गेल्या. आणि , नियती म्हणा , भागधेय म्हणा, त्याच्या वरवंट्याखाली पिचतानाही आपला अभिमान , आपले सत्त्व न हरवणारी माणसे त्यांनी रंगवली. प्रस्तुत कथेतील कथानक हे , त्यांच्या पुढील प्रवासाच्या पाऊलखुणा दाखविणारेच आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;कथेचा निवेदक आहे एक साताठ वर्षांचा , गावातल्या एका गरीब (बहुदा ब्राह्मणी) कुटुंबात वाढणारा एका मुलगा. काळ : बहुदा आजपासून सत्तरेक वर्षांपूर्वीचा. कुटुंबात माणसे तीनच. आई-वडील आणि हा छोटा मधू. कथा सुरु होते तेव्हा चैत्र महिना चालू आहे आणि घराघरांमधून हळदी कुंकवाचे कार्यक्रम चालू आहेत. रोज कुठे ना कुठे कार्यक्रम असतो. या छोट्याशा गावातलीच एक बाई घराघरांमधे जाऊन "आजचे हळदीकुंकू कुलकर्ण्यांकडे , आजचे हळदीकुंकू नाईकांच्या वाड्यावर" अशी दवंडी पिटत जाते. रोज संध्याकाळी सवाष्णी एकमेकांच्या घरी आपापल्या पोरांना घेऊन जातात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;छोटा मधूही नाईकांच्या वाड्यावर आईबरोबर जातो. हा भला थोरला वाडा. मोठी मोठी जाजमे, हंड्या-झुंबरे , अत्तरांचा आणि वेण्यांचा घमघमाट. इतर बायकांबरोबर मधुची आई ओटी भरवून घ्यायला बसते. थोरामोठ्यांकडचा मोठा समारंभ. गर्दी. या गर्दीत इतर पोरांबरोबर खेळतानाही मधूचे लक्ष आईकडे आहे. नाईकबाई एका नोकराणीबरोबर फिरत सगळ्यांची ओटी भरतात. मधूच्या आईची ओटी भरायची वेळ आल्यावर त्यांना वगळून पुढे जातात. मधूची आई वाटा पाहाते आणि शेवटी मालकीण बाईंकडे जाते नि त्याना आठवण करून देते. मालकीण बाईंचा समज झालेला असतो की यांची ओटी भरलेली असतानाही , थोडे आणखी धान्य मिळण्याकरता ही बाई परत पदर पसरून बसली. ती मधूच्या आईचा अपमान करते. एक अवाक्षर न बोलता आई इतकेच म्हणते , की ओटी म्हणजे सवाष्णीचा मान आहे. तो राखण्याकरता तरी ओटी भरा - वाटले तर एक दाणा टाका. न राहवून नाईकबाईची सासूही तसे करायला आपल्या सुनेला विनविते. पण शेवटी मधू आणि आई रिक्तहस्ते घरी परततात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;घरी आल्यावर रात्री एकही शब्द न बोलता आई मधू आणि त्याच्या वडिलांना जेवायला घालते. दुसर्‍या दिवशी ती आपले काही दागिने काढून मधुच्या वडिलांना देते आणि त्याचे पैसे करून एका मोठ्या हळदी कुंकवाची तयारी करायला सांगते. वडील काहीही न विचारता हो म्हणतात. आई त्यांना विचारतेही : "तुम्हाला का असा प्रश्न नाही पडला ?" वडील शांतपणे म्हणतात : "स्वतःकरता कधीही काहीही न मागणारी तू काहीतरी करायला सांगते आहेस. त्यामागे नक्की काहीतरी आहे. मी कशाला विचारू ? उद्या तू म्हणालीस की निखार्‍यावरून चालत जा तर तेही करेन." हे सारे मधू पहातो , नोंदवतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;दुसर्‍या दिवशी मधूकडे आजवर झाले नसेल इतके मोठे हळदीकुंकू. गावभर दवंडी गेलेली असते - नाईकांकडेही. समारंभ खूप वेळ चालतो. एरवी घराचे मालक असणारे मधूचे बाबा त्या संध्याकाळपुरते घराबाहेर. मधूची आई सगळ्यांची रितीने ओटी भरते , विचारपूस करते. सगळ्या बायकांच्या नजरेत तिच्याबद्दल आदर आणि प्रेम आहे. आईची एक नजर अर्थातच दाराकडे. सगळ्या येऊन गेल्या ; पण नाईक बाई नाहीत. शेवटी खूप उशीरा सासू नि सून आपल्या बग्गीतून हजर होतात. मधूच्या छोट्याशा घरातल्या सजावटीने , आदबशीर , घरंदाज आतिथ्याने भारल्यासारख्या होऊन जातात. भरपूर मोठी ओटी भरून घेताना नाईक सूनबाई इतकेच म्हणते "तुमच्याकडे होते होय हळदीकुंकू ? मला कल्पना नव्हती." दोघी निघतातच.&lt;br /&gt;&lt;br /&gt;बग्गीत सून बसलेली असताना सासू क्षणभर आईपाशी येते नि म्हणते : बाई, मनात तळपट धरू नकोस. आता माझं राज्य नाही घरात. नवीन माणसं आली. मी झाल्या प्रकाराने लाजलेले आहे. जमेल तेव्हा याची भरपाई करेन.यावर मधुची आई जे म्हणते ते अगदी साधेच - पण सोन्याच्या अक्षरांनी लिहून ठेवण्यासारखे. ते सांगते : " मी तर झाला प्रकार केव्हाच विसरले. मला त्याचे काहीच महत्त्व नाही. पण त्यावेळी माझा मुलगा समोर होता. त्याला झालेल्या प्रसंगाची आठवण नेहमी राहील. हा हळदीकुंकू सोहळा त्याच्यासाठी. " दूर अंधारात मधू हे सर्व पहातो. बग्गी हलते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;वर्ष उलटते. पुन्हा चैत्र येतो. मधूच्या घरासमोर एके दुपारी बग्गीचा आवाज आल्यावर आई पटकन आत जायला वळते. मधूला सांगते : "नाईकबाई येतील. त्यांना सांग मी न्हाणीघरात आहे. जे सांगतील ते फक्त ऐक. जाताना फक्त करंडा दे कुंकवाचा त्यांना. " मिनिटाभरात सासूबाई दारात येतातच. मधू त्यांना ठरल्याप्रमाणे सांगतो. त्या आलेल्या असतात हळदीकुंकवाचे निमंत्रण द्यायला - जातीने , सर्वात पहिल्या घराचा मान द्यायला. निरोप देतात , कुंकू लावून निघून जातात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मधू आत येतो. आई त्याला म्हणते : "मधू , आयुष्यात चालताना आपण शक्यतो चिखल टाळावा. शिवाय आपल्या साध्या चालण्याने इतरांवरही तो उडणार नाही याची काळजी घ्यावी. " मधूला काही उमगत नाही. माजघराच्या अंधारात उभ्या आईला म्हणतो : "म्हणजे आपले बाबा गेले हे त्यांना कळू द्यायचे नव्हते होय ?" आणि इतका वेळ आपल्या गंभीर , ताठ चेहर्‍याने वावरणार्‍या आईला हुंदका येतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;कथानक भाग संपूर्ण&lt;br /&gt;&lt;br /&gt;हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे क्रांती कानडे यांनी. आईची भूमिका केली आहे सोनाली कुलकर्णी यांनी. नाईक सासूचे काम लालन सारंग यांचे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;संपूर्ण चित्रपटाची हाताळणी मूळ कथेशी इमान राखणारी , त्या कथेच्या घरंदाजपणाशी इमान राखणारी झाली आहे. कुठेच भडक, बटबटीतपणा नाही. झालेला अपमान , त्याची केलेली भरपाई , साताठ वर्षाच्या मुलावर नकळत घडलेले संस्कार या सगळ्या गोष्टी उत्तम रीतीने टिपल्यात. आई वडीलांमधील शालीन , घरंदाज स्नेहाचे चित्रण , कोसळलेल्या संकटाला धीराने सामना देताना इतरांवर आणि स्वतःवर "चिखल उडू न देण्याची " घेतलेली काळजी आणि हे यच्च्यावत टिपणारे एक बालमन. सत्तर वर्षांपूर्वीच्या ब्राम्हणी घरातले वातावरण , पेहराव , हंड्या-झुंबरे. एकही सैल , अनावश्यक संवाद नाही. मी कानडे यांना सलाम करतो. पालेकरांनी त्यांच्याकडून खूप शिकावे अशातली गत. सोनाली कुलकर्णी यांच्याबद्दल मला थोडी शंका होती. बट शी हॅज नेल्ड द रोल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;हा , केवळ ३० मिनिटांचा चित्रपट दृष्ट लागण्यासारखा झाला आहे.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/2301518882851474855-5119806397402641196?l=muktasunit.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://muktasunit.blogspot.com/feeds/5119806397402641196/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=2301518882851474855&amp;postID=5119806397402641196' title='6 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2301518882851474855/posts/default/5119806397402641196'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2301518882851474855/posts/default/5119806397402641196'/><link rel='alternate' type='text/html' href='http://muktasunit.blogspot.com/2008/12/blog-post_5444.html' title='&quot;चैत्र&quot;'/><author><name>MuktaSunit</name><uri>http://www.blogger.com/profile/00445626723230179642</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://1.bp.blogspot.com/-vZSy_JeY3tg/Ti7ehA38n5I/AAAAAAAAA6U/xfdKbNO0nnk/s220/rajan.jpg'/></author><thr:total>6</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-2301518882851474855.post-5432272554484092846</id><published>2008-12-09T20:06:00.000-08:00</published><updated>2008-12-09T20:31:36.070-08:00</updated><title type='text'>"वर्जेश ईश्वरलाल सोलंकीच्या कविता"</title><content type='html'>अलिकडे काही नवीन कवींच्या आंतरजालावर वाचत होतो. एका कवितेपाशी आलो नि वाटले , काहीही झाले तरी या माणसाच्या कविता वाचल्याच पाहिजेत. कवीचे नाव : वर्जेश सोलंकी. सुदैवाने यांचा काव्यसंग्रह हाताशी लागला. कवितासंग्रहाच्या बाबतीत असे क्वचितच घडते की पहिली कविता वाचायला सुरवात करावी नि शेवटची कधी आली ते कळूच नये. प्रस्तुत संग्रहच निव्वळ ६०-६५ पानांचा आहे म्हणून असेल; पण एका बैठकीत वाचून झाला सुद्धा.&lt;br /&gt;&lt;br /&gt;१९९० च्या दशकात भारताची व्यवस्था कूस पालटत होती. येणार्‍या नव्या युगाबरोबर नवे प्रश्नही आलेच. शासनाच्या, अर्थव्यवस्थेच्या, समाजव्यवस्थेच्या बदलांची स्पंदने नव्वदीच्या दशकातल्या तरुण कवींच्या रचनांमधे ऐकू यायला लागली. वर्जेश सोलंकी याच पीढीचे कवी. एखाद दोन कवितांचा आस्वाद आपण घेण्याचा प्रयत्न करूया.&lt;br /&gt;&lt;br /&gt;शीर्षक : व्हॅक्युमक्लीनर&lt;br /&gt;पसरलो हॉलभर&lt;br /&gt;सुगंधित स्प्रेच्या वासाबरोबर&lt;br /&gt;म्हणून लक्षात नाही आली कुणाला&lt;br /&gt;मोज्यातली दुर्गंधी.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मित्रानं दाखवली&lt;br /&gt;एकेक खोली&lt;br /&gt;कीचन&lt;br /&gt;कोठेच खिडकी नसलेली&lt;br /&gt;आली ऐकू&lt;br /&gt;एक्झॉस्ट् फॅनची संथ घरघर&lt;br /&gt;कण्हल्यासारखी&lt;br /&gt;ताटंबिटं ग्लासंबिसं बशाकप डबेबिबे&lt;br /&gt;नावं लेबलासहित&lt;br /&gt;व्यवस्थितपणे मांडून फडताळावर.&lt;br /&gt;&lt;br /&gt;हॉलमधल्या भिंतीच्या रंगाला&lt;br /&gt;मॅचिंग असलेलं सागवानी फर्निचर&lt;br /&gt;बोन्सायची झाडं शोभेच्या वस्तू&lt;br /&gt;गणपतीची कलात्मक फ्रेम&lt;br /&gt;एकंदर सगळं छानच.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आपण त्यात मिसमॅच की काय ?&lt;br /&gt;या विचारानं मी एसीकंटेन्ड रूममधे&lt;br /&gt;घामाघूम.&lt;br /&gt;मित्र म्हणाला:&lt;br /&gt;खिडकीतून पाऊस छानच दिसतो&lt;br /&gt;आणि चंद्र&lt;br /&gt;नुकताच पेंट दिलेल्या बंगल्यासारखा. उजळ.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मी जेवलो&lt;br /&gt;सवय नसताना&lt;br /&gt;काटेचमच्यातून&lt;br /&gt;ताटाभोवती खरकटं पडू न देण्याची खबरदारी घेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;इतपत सर्व ठीक होतं.&lt;br /&gt;मात्र मित्राच्या बायकोनं कपाटातून व्हॅक्युमक्लीनर काढला&lt;br /&gt;तेव्हा&lt;br /&gt;लटपटलोच&lt;br /&gt;निघालो घाई-घाई करत फ्लॅटबाहेर&lt;br /&gt;वाटलं आता ओढला जाईन की काय ?&lt;br /&gt;फोलपटासारखा&lt;br /&gt;फरशीवरल्या धुळीबरोबर.&lt;br /&gt;----------------------------------------------------------&lt;br /&gt;कविता वाचली आणि त्यातील विनोदाने हसायला आलेच ; पण त्यात टिपलेली विसंगती , आपल्या आयुष्यातील साध्यासुध्या गोष्टींमधे माणसांपेक्षा वस्तूंना आलेले महत्त्व या गोष्टी नजरेआड कशा होतील. मुख्य म्हणजे अगदी नेहमीच्या आयुष्यातल्या संवादांसारखी कविता. ना त्यात कसला अभिनिवेश ना प्रतिमा-उपमांचा सोस.&lt;br /&gt;&lt;br /&gt;दुसरी कविता तुमच्यापुढे मांडतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;शीर्षक : आपण कविता लिहाव्यात का ?&lt;br /&gt;&lt;br /&gt;आपण कविता लिहाव्यात का ?&lt;br /&gt;की न लिहाव्या&lt;br /&gt;की लिहाव्याच&lt;br /&gt;आपल्या लिहीण्या न लिहीण्यानं कोठे&lt;br /&gt;फारसा फरक पडणारेय ?&lt;br /&gt;उदा: पेरली जातील काय क्रांतीची बीजं&lt;br /&gt;फ्रस्ट्रेटेड युवा पीढीच्या मनात&lt;br /&gt;क्रीएट होईल काय एखादा पॉझीटीव्ह अप्रोच वगैरे&lt;br /&gt;की आपलं लिहीणं म्हणजे&lt;br /&gt;बापाच्या शब्दात&lt;br /&gt;एकंदर भिकारचोटगिरीची प्राथमिक लक्षणं&lt;br /&gt;की&lt;br /&gt;कपाटामागं उंदरानं सोडलेल्या लेंड्या&lt;br /&gt;की&lt;br /&gt;उगाच आतलाबितला आवाज/हुक्की / उत्कटता&lt;br /&gt;की&lt;br /&gt;शब्दांचा उभाआडवा कीस/फापटपसाराकीफलाणा-ढिकाणा.&lt;br /&gt;------------------------------------------------------------------------&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/2301518882851474855-5432272554484092846?l=muktasunit.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://muktasunit.blogspot.com/feeds/5432272554484092846/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=2301518882851474855&amp;postID=5432272554484092846' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2301518882851474855/posts/default/5432272554484092846'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2301518882851474855/posts/default/5432272554484092846'/><link rel='alternate' type='text/html' href='http://muktasunit.blogspot.com/2008/12/blog-post_09.html' title='&quot;वर्जेश ईश्वरलाल सोलंकीच्या कविता&quot;'/><author><name>MuktaSunit</name><uri>http://www.blogger.com/profile/00445626723230179642</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://1.bp.blogspot.com/-vZSy_JeY3tg/Ti7ehA38n5I/AAAAAAAAA6U/xfdKbNO0nnk/s220/rajan.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-2301518882851474855.post-5793036770791504375</id><published>2008-12-09T19:57:00.001-08:00</published><updated>2008-12-09T20:05:15.583-08:00</updated><title type='text'>"नो कंट्री फॉर् ओल्ड् मेन्"च्या निमित्ताने</title><content type='html'>काल रात्री "नो कंट्री फॉर् ओल्ड् मेन्"हा यंदाचा ऑस्करविजेता सिनेमा पाहिला. चित्रपट परिणामकारक वाटला असे सांगितले तर आश्चर्य वाटायला नकोच. (उलट "यात तुम्ही काय नवीन सांगताय् राव ! " अशी कुणी खिल्ली उडवेल ; आणि ती योग्यच ठरेल ! असो. )&lt;br /&gt;&lt;br /&gt;थोडी चित्रपटाची ओळख करून देतो. पुढील परिच्छेदामधे आणि त्यानंतरच्या विवेचनामधे कथानक आणि त्याचे प्रमुख धागेदोरे उघड करत आहे. ज्याना हा चित्रपट पहायचा असेल आणि पहाताना रसभंग होऊ द्यायचा नसेल त्यानी वाचू नये.चित्रपट १९८० सालातील पश्चिम टेक्सास मधे घडतो. अमली पदार्थाच्या व्यापारातील एका मेक्सिकन गॅंगमधे एका व्यवहारामधे भीषण हिंसा घडलेली आहे. लुआलिन् मॉस् या नावाचा , एकेकाळच्या व्हिएतनाम युद्धात भाग घेतलेला , पण आता अगदी दरिद्री परिस्थितीमधे रहाणारा एक टेक्सास-कर (!) माणूस शिकार करत असताना हा घटनाप्रसंग घडून गेल्यावर घटनास्थळी पोचतो. मेलेल्या अवस्थेतल्या माणसांच्या आणि त्यांच्या गाड्यांच्या सान्निध्यात त्याला मिळते एक काळी बॅग्, ज्यात २० लाख डॉलर्स आहेत. त्याच ठिकाणी त्याला या घटनेतला शेवटचा बळी आचके देताना दिसतो. अर्थातच , मॉस ती बॅग उचलतो , जखमी माणासाची पर्वा न करता तडक घरी येतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;कथानकाच्या दुसर्‍या धाग्यात अन्त्वान् चिरग् या नावाच्या , एका थंड रक्ताच्या हिंस्त्र खुनी मारेकर्‍याची ओळख प्रेक्षकाना दोन प्रसंगातून करून दिली जाते. हा सैतान एका पोलीस अधिकार्‍याचा आणि वाटेतल्या एका निरपराध वाहनचालकाचा निर्घृण खून करतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;इकडे मॉसभाऊ आपल्या घरी २० लाखांच्या शेजेवर झोपलेले असताना अचानक त्याना पापक्षालनाचा झटका येतो. आचके देत असलेल्या जखमी माणसाकरता पाणी घेऊन महाशय घटनास्थळी पोचतात. रात्रीच्या अंधारात त्याला दिसते की तो शेवटचा माणूस मेलाय्. आणि नेमके तेव्हाच घटनास्थळी गॅंगचे इतर सभासद २० लाख डॉलर्सचा छडा लावायला आलेले असतात. अन्त्वान् चिरगवर २०लाख डॉलर्सचा छडा लावायची कामगिरी गॅंगकडून दिली गेलेली असते. मॉसवर हल्ला होतो, त्याचा पाठलाग केला जातो. यातून तो सुटतो आणि पळायला लागतो. चिरग् त्याच्या मागेमागे. साक्षात् मृत्युरूपी असे चिरग साहेब आपल्या मालकांवरही प्राणाघातक हल्ला करून त्याना यमसदनास धाडतात. मॉस आणि चिरग् यांचा पाठलागाचा एक प्रमुख धागा.&lt;br /&gt;&lt;br /&gt;या चित्रपटातला तिसरा आणि आणखी एक महत्त्वाचा धागा म्हणजे पोलिसांचा म्होरक्या, शेरीफ एड् टॉम् बेल्. फौजदार वास काढत काढत या पाठलागाचा मागोवा घेत रहातो ; आणि एकूण अमली पदार्थातील भीषण हिंसेने, विशेषतः चिरगने केलेल्या कत्तलीने दिड्.मूढ होत रहातो. पण पाठलाग करतच रहातो.&lt;br /&gt;वाटेतल्या प्रत्येकाला मारत मारत चिरग् शेवटी एका अपघातामधे जखमी होतो. पण पोलिसाना न सापडता सहीसलामत सुटतो. मॉस गॅंगच्या इतर सभासदाकडून मारला जातो. शेरीफ आपल्या कर्तुम्-अकर्तुमच्या मानसिक तिढ्यामधे शेवटी निवृत्त होतो. चित्रपट संपतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;कथानक भाग संपूर्ण&lt;br /&gt;&lt;br /&gt;काही ठळक बाबी :&lt;br /&gt;हा एका अर्थाने "पीरीयड् मूव्ही" - एका ऐतिहासिक कालखंडामधे घडाणारा चित्रपट आहे. फक्त हा कालखंड केवळ २५ वर्षे जुना आहे. (कलादिग्दर्शकाने ही एक थोडी बाब काहीशी आव्हानत्मक आहे असे म्हण्टले आहे. ऐतिहसिक चित्रपट बनवण्याची तंत्रे , आडाखे ठरलेले असतात. केवळ २५ वर्षे जुना कालखंड चितारताना म्हण्टले तर "सेट्स्" आणि कृत्रिम "प्रॉप्स्" चा वापर करायला नको ; पण हवासुद्धा ! ८०च्या काळाच्या गाड्या, वेषभूषा या सगळ्या गोष्टी अर्थातच अत्यंत विश्वसनीय रीत्या चितारल्या गेल्यात.)&lt;br /&gt;&lt;br /&gt;कथानकाच्या एकंदर सारांशावरून हा एक निव्वळ ठराविक अंगाने जाणारा पाठलागाचा आणि हिंसेचा पट आहे असे कुणालाही वाटेल. आणि या चित्रपटाचे हे दोन प्रमुख घटक आहेतही. पण या व्यतिरिक्त चित्रपट नियती, जगण्या-मरण्याचे स्वातंत्र्य , योगायोग , भागधेय, मनुष्यस्वभाव, नीतीमूल्ये , कर्तुमकर्तुम् यांच्यातला संदेह या गोष्टीना स्पर्श करतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;चिरगचे पात्र दहशत वाटावे असे झाले आहेच. पण त्याच्याबद्दल निव्वळ घृणा वाटावी अशा एकजिनसी काळ्या रंगात तो रंगविला गेलेला नाही. एका अर्थाने त्याला मृत्यूचे प्रतीक या अर्थाने पहाता येईल. मृत्यूइतक्याच अटळपणे तो आपल्या रस्त्यात येणार्‍याना टिपतो. क्वचित् कधीतरी तो आपल्या सावजाला नाणेफेक करून जगण्या-मरण्याची संधी देतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;एकूणच , दिग्दर्शकाचा सगळा हेतू मुळी एक निर्णायक असा शेवट चितारण्याकडे नाहीच, हे अगदी स्पष्ट आहे. असल्या टोकाच्या परिस्थितीमधे माणासातल्या आदिम प्रवृत्ती कशा कार्यरत होतात हे त्याना दाखवायचे होते. स्थलकालाचे चित्रण, घटना आणि पात्रे यांच्या अत्यंत घट्ट अशा वीणीतून दिग्दर्शकद्वय नीतीमूल्यांची रिलेटिव्हीटी (मराठी शब्द) , मनुष्यस्वभाव आणि नियती यांच्यातील नाट्य चितारतात.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/2301518882851474855-5793036770791504375?l=muktasunit.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://muktasunit.blogspot.com/feeds/5793036770791504375/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=2301518882851474855&amp;postID=5793036770791504375' title='3 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2301518882851474855/posts/default/5793036770791504375'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2301518882851474855/posts/default/5793036770791504375'/><link rel='alternate' type='text/html' href='http://muktasunit.blogspot.com/2008/12/blog-post.html' title='&quot;नो कंट्री फॉर् ओल्ड् मेन्&quot;च्या निमित्ताने'/><author><name>MuktaSunit</name><uri>http://www.blogger.com/profile/00445626723230179642</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://1.bp.blogspot.com/-vZSy_JeY3tg/Ti7ehA38n5I/AAAAAAAAA6U/xfdKbNO0nnk/s220/rajan.jpg'/></author><thr:total>3</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-2301518882851474855.post-8426049225820272705</id><published>2007-08-08T21:24:00.000-07:00</published><updated>2007-08-08T21:25:19.733-07:00</updated><title type='text'>माझा जाहीरनामा (याने के जे आयुष्याचा खूप विचार करतात त्यांच्याकरता मला काही समजलेल्या गोष्टी )</title><content type='html'>फारच थोड्या गोष्टी स्थिर, अचल , असतात. त्या तशा मिळाल्या तर जतन करायला हव्यात. पण नाही मिळाल्या तरी आपण फारसे गरीब नाही होत. साक्षात् जी ए अपुरे तरी वाटू शकतात किंवा आपल्या स्वतःच्या जळत्या प्रश्नांची उत्तरे जवळ नसल्यासारखे. हृदयनाथमधे तोचतोपणा वाटायला लागतो. अचानक वपुकाळे वगैरेंबद्दल आणि ते वाचणाऱ्यांबद्दल दाखवलेल्या क्रौर्याचा पश्चात्ताप होऊ शकतो. आयुष्याची किंमत म्हणा, त्याचा अर्थ म्हणा, या गोष्टी तुमच्या तुम्ही ठरवायच्या. इतरांच्या मूल्यमापनाकरता  जगायला लागणे , सतत त्यांच्या मोजपट्टीकरता उंच उंच उड्या मारणे यात खूपच वेळ वाया जातो. हाती लागते ते अप्राप्य मृगजळ. हपापलेपणात जसा अर्थ नाही तसा न झेपलेल्या निरिच्छतेमध्येसुद्धा. ज्ञानाचे, वैराग्याचे, चांगुलपणाचे बुरखे प्रसंगी उघडउघडच्या स्वार्थीपणा, कोतेपणा आणि बावळटपणापेक्षा वाईट. इन जनरल , बुरखे वाईट. आनंदाची निधाने शोधायला हवीत. मिळाली तर थोडे स्वार्थी होऊन उपभोगायला हवीत. उपभोगताना अपराधीपणाची लक्तरे टाकायला हवीत. उच्चभ्रूत्त्वाचा मलिन लगदा निपटायला हवा. शरीराला घालून पाडून वागवणें चूक. अस्थिर मनाच्या आंधळी-कोशींबीरीत साथ देते ते शरीर. शरीर सलामत तो आत्मे पचास, विचार हजार, तत्त्वज्ञान लाख.रोज नवा शोध लावायला हवा. रोज नवा हेतु शोधायला हवा. नवा अर्थ शोधायचा ध्यास हवा. प्रत्येक नव्या सकाळी आपण कोरे असतो. मनापासून हसण्या-रडण्याची काहीतरी कारणे शोधायला हवीत. स्वत:चे हरवलेले माणूसपण पुन्हा शोधायला पाहिजे.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/2301518882851474855-8426049225820272705?l=muktasunit.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://muktasunit.blogspot.com/feeds/8426049225820272705/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=2301518882851474855&amp;postID=8426049225820272705' title='12 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2301518882851474855/posts/default/8426049225820272705'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2301518882851474855/posts/default/8426049225820272705'/><link rel='alternate' type='text/html' href='http://muktasunit.blogspot.com/2007/08/blog-post.html' title='माझा जाहीरनामा (याने के जे आयुष्याचा खूप विचार करतात त्यांच्याकरता मला काही समजलेल्या गोष्टी )'/><author><name>MuktaSunit</name><uri>http://www.blogger.com/profile/00445626723230179642</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://1.bp.blogspot.com/-vZSy_JeY3tg/Ti7ehA38n5I/AAAAAAAAA6U/xfdKbNO0nnk/s220/rajan.jpg'/></author><thr:total>12</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-2301518882851474855.post-5862296199920041227</id><published>2007-05-24T09:35:00.000-07:00</published><updated>2008-12-09T20:33:26.999-08:00</updated><title type='text'>आठ वर्षांनी ...</title><content type='html'>महाराष्ट्राचे अत्यंत लाडके लेखक पु . ल. देशपांडे यांना जाऊन येत्या जून मध्ये सात वर्षें होतील.&lt;br /&gt;गेल्या सात वर्षांत त्यांच्या स्मरणार्थ , त्यांच्या एकूण कारकीर्दीचा मागोवा , आढावा घेणारी , त्यांचा आठवणींना उजाळा देणारी , त्यांच्या अप्रकाशित लेखनाची अनेक पुस्तके आली आणि ही सर्व पुस्तके उत्तम खपली. पु. लं. ची कितीतरी जुनी पुस्तके , गाणी , नाटके या गेल्या सात वर्षांत अगदी चांगली खपली ; आणि हा ट्रेंड थांबण्याची चिन्हे नाहीत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पु. लं. ची हिमालय-सदृष्य सावली गेल्या शतकाच्या शेवटच्या चार -पाच दशकांवर पडली. त्यांच्या प्रतिभेचा सूर्य उणीपुरी पन्नास वर्षे ते हयात असतानाच तळपत होता. हा सगळा इतिहास सर्वज्ञात आहे.&lt;br /&gt;आज सात वर्षांनी , ही सावली दूर गेल्यानंतर , त्यांच्या मृत्यूनंतर आलेल्या त्यांच्या प्रेमाच्या पुराची लाट किंचितशी ओसरल्यासारखी झाल्यानंतर त्यांच्या आपल्या आताच्या आयुष्याशी राहिलेल्या नात्याबद्दल आपल्याला काहीशा समतोलपणे बोलता येईल असे वाटते. त्यांच्याबद्दलचा "रेव्हरंस" लोपलेला नाही ; परंतु त्यांच्या "रिलेव्हन्स" बद्दल बोलावे इतपत काळ उलटला आहेसे वाटते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्यांच्या लिखाणाकडे मागे वळून पहाताना, काही प्रश्नांचा धांडोळा घ्यावासा वाटतो ...आपल्या सध्याच्या जगण्याच्या संदर्भात पु. ल. कुठे उभे आहेत? त्यांच्या लिखाणातील काय काय अजूनही आवडते ? काय काय मार्मिक वाटते ? "ओल्ड रेलीक" वाटावा असा कुठला भाग वाटतो ? एकंदर जगण्याबद्दलचे त्यांचे कुठले विचार चिरकाल टिकून आहेत असे वाटते ?&lt;br /&gt;&lt;br /&gt;माझ्या प्रश्नांची दिशा थोडीशी तुमच्या आमच्या जगण्याशी संबंधित आहे. पु. लं. च्या लिखाणातून जगण्याची काही एक पद्धती, काही मूल्ये , यांचे दर्शन घडते. त्यांनी या तत्त्वांचा म्हणा , मूल्यांचा म्हणा , वेगळा असा उद्घोष कधी केला नाही. पण "तुझे आहे तुजपाशी" सारख्या कृतींतून उघडउघड तर अन्य ललित लिखाणांतून प्रच्छन्नपणे त्यांच्या जगण्यबद्दलच्या दृष्टिकोनाचे दर्शन घडले आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मराठी मनावर या वृत्तीचा नक्कीच प्रभाव पडत आला आहे. गेल्या काही पिढ्या याची साक्ष देतील. बदलत्या काळात, पु. लं. च्या पश्चात, त्यांनी स्वीकारलेली कुठली मूल्ये टिकतील ? पु. ल. कितपत "रेलेव्हंट" वाटतील ? आणि जर का त्यांचा ठसा पुसट होत असेल तर , त्यांनी स्वीकारलेल्या जगण्याबद्दलच्या दृष्टिकोनातील कुठला भाग कालातीत होता काय ?&lt;br /&gt;&lt;br /&gt;पुलंच्या लिखाणातील काही गोष्टींचा या निमित्ताने परामर्श घ्यावासा वाटतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;स्मरणरंजन : इंग्रजीत ज्याला नॉस्टाल्जिया म्हणतात त्याचे दर्शन पुलंच्या जवळजवळ प्रत्येक लिखाणात दिसेल. त्यांच्या लेखक म्हणून ऐन बहरात असण्याच्या कालात या मुद्द्याचे अपील खूप मोठे होतेच ; पण ऐंशी-नव्वदीच्या दशकात जेव्हा पुलंनी जवळजवळ लेखनाच्या मुख्य प्रवाहापासून संन्यास घेतला होता, त्या काळातील पिढ्यांवर सुद्धा , या स्मरणरंजनाचा प्रभाव कमी नव्हता. बालगंधर्व, पुलंचे आजोबा, अगदी बोरकरसुद्धा ..... या साऱ्यांना कधीही न पाहिलेली मंडळी त्याना पहात होती पुलंच्या चष्म्यातून. वसंतराव देशपांडे , केसरबाई केरकर यांसारख्यांना या पिढीतील लोकांनी ओझरते पाहिले असेलही ; पण ते त्यांच्या उतारवयात , कारकीर्द आटोपताना. पण त्यांची व्यक्तिचित्रे अगदी अलिकडील पिढ्यांमढ्ये लोकप्रिय होती.&lt;br /&gt;पुलंच्या अस्तानंतर या स्मरणरंजनाची जादू लोप पावत असल्यासारखी का वाटत असेल? माझ्या मते, त्याचे एक उत्तर असे असेल की, पुलंच्या अस्तानंतर जवळजवळ लगेच, त्यांना पाहिलेल्यांची, त्यांच्याबरोबर काम केलेल्यांची , त्यांचे कर्तृत्त्व घडताना ते अनुभवणाऱ्यांची पिढीच काळाच्या पडद्याआड गेली. हे संक्रमण जास्त जाणवले ते पुलंच्या एक्झिटमुळे. याचा अर्थ या पिढीतील सर्वच्या सर्व माणसे इतक्या थोड्या कालावधीत देवाघरी गेली, असा कुणी शब्दशः अर्थ काढू नये. पण ही पिढी जीवनाच्या क्रीडांगणातून निवृत्त होत गेली आणि पुलंच्या लिखाणातील स्मरणरंजनाच्या एका मोठ्या भागाचे संदर्भ विरल्यासारखे झाले असे मला वाटते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;भाषेची एकूण सांस्कृतिक संदर्भातील स्थिती, तिचे वाङ्मयव्यवहारातील आणि मुख्य म्हणजे एकूण सामाजिक, राजकीय व्यवहारातील स्थान हे सर्व प्रश्न गुंतागुंतीचेच. मराठी सारस्वतात आता जे काही थोडे लोक राहिले आहेत त्यांच्यामधे हा विषय सर्वात महत्त्वाचा आहे यात शंका नाही. पण केवळ एका अत्यंत लोकप्रिय दिवंगत लेखकाबद्दलच नव्हे , तर त्या लेखकाने आपल्या लिखाणातून वर्णन केलेल्या जीवनसरणीबद्दल , जगण्याच्या एका भूमिकेबद्दल हा विचार चाललेला आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;अलिकडेच मला काही लोकांशी संवाद करताना असे दिसले की,"असामी असा मी" , "बटाट्याची चाळ" यांसारखे ललित लिखाण काही लोकाना संदर्भहीन वाटते. मला व्यक्तिश: तसे वाटत नाही हा भाग अलाहिदा. (किंबहुना, बटाट्याची चाळ मला पुलंची एक स्वतंत्र कलाकृती, जिचे मराठी साहित्यातील स्थान चिरकाल टिकून राहील असे वाटते.) परंतु, हे असे वाटणे या गोष्टीचे निदर्शक आहे की, पुलंचा रिलेव्हन्स तपासणे हे नक्कीच अभ्यसनीय ठरते.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/2301518882851474855-5862296199920041227?l=muktasunit.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://muktasunit.blogspot.com/feeds/5862296199920041227/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=2301518882851474855&amp;postID=5862296199920041227' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2301518882851474855/posts/default/5862296199920041227'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2301518882851474855/posts/default/5862296199920041227'/><link rel='alternate' type='text/html' href='http://muktasunit.blogspot.com/2007/05/blog-post_7452.html' title='आठ वर्षांनी ...'/><author><name>MuktaSunit</name><uri>http://www.blogger.com/profile/00445626723230179642</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://1.bp.blogspot.com/-vZSy_JeY3tg/Ti7ehA38n5I/AAAAAAAAA6U/xfdKbNO0nnk/s220/rajan.jpg'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-2301518882851474855.post-3233207729142917974</id><published>2007-05-24T09:32:00.000-07:00</published><updated>2007-05-24T09:33:13.091-07:00</updated><title type='text'>काग़झी है पैरहन....</title><content type='html'>"घटना घडतात.पुरातल्या ओंडक्यासारखी माणसं त्यात वाहून जातात.घडायचं ते घडून जातं..पण तरीही पर्याय असतातच ठाकलेले. तडफडण्याचे.. हसण्याचे.. रडण्याचे.. हरण्याचे..जिंकण्याचे..क्षमेचे... सूडाचे... स्वीकृतीचे... तुकण्याचे... साक्षित्वाचे.त्यातला एकच निवडता येणार असतो, आणि निवडावा तर लागणारच असतो !पर्यवसान ठाऊक नसताना अंधारात घ्यावी लागणारी उडी...माणसाच्या आयुष्यात नियत आहे ते हे.यालाच आपण स्वातंत्र्य म्हणतो !"&lt;br /&gt;वरील उतारा आहे मराठी कथालेखिका मेघना पेठे यांच्या एका कथेतील. नव्वदीच्या दशकात पेठे यांच्या कथा प्रकाशित व्हायला सुरुवात झाली. दोन कथासंग्रह आणि एका कादंबरीनंतर "मराठीतील अग्रगण्य लेखिका" म्हणून त्या आता गणल्या जाऊ लागल्या आहेत. माणसामाणसांमधील संबंधांची , नात्यांची चित्रणें , त्या नातेसंबंधांतील निरर्थकतेची  (किंवा अतार्किक , गूढ  वाटेल अशा अर्थांची) दर्शने, आणि या साऱ्यातून आपल्या समग्र अस्तित्वाकडे पहाण्याची काव्यात्म, चिंतनगर्भ संवेदनशीलता हा जणू प्रत्येक हाडाच्या, सच्च्या लेखकाचा स्थायिभाव असतो. पेठे यांच्या लिखाणाला या सर्वांवर नक्की दावा सांगता येईल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;कसे आहे हे लेखिकेच्या कथांमधील जग? बहुतांश कथा आजच्या मुंबईच्या पार्श्वभूमीवर घडतात. पेठे यांना अतिशय परिचयाचा हा शहरी भाग त्यांच्या कथेचा एक अविभाज्य भाग आहे. हे शहर,त्याचे युध्यमान दैनंदिन आयुष्य, त्याचा बिनचेहेऱ्याचा, गिळंकृत करणारा निर्मम बकालपणा हा या कथेतील बोधस्वर आहे. कधीकधी तर कथांचे हे पर्यावरण  जणू एक पात्र बनून येते : कथेचे ते पर्यावरण नसते; तर त्या पर्यावरणातच ती कथा घडते. आशयामध्ये वातावरणाला बेमालूम मिसळण्याच्या लेखिकेच्या कौशल्याची तुलना जी. ए. कुलकर्णींशी करायचा मोह इथे होतो...&lt;br /&gt;&lt;br /&gt;कुणाकुणाच्या कहाण्या लेखिका सांगते? औरंगाबादेतून आलेला, प्रायोगिक नाटकांमधील एक हाडाचा, हिऱ्यासारखी गुणवत्ता असलेला "स्ट्रगलर" ,  ज्याने या वेडापोटी, या मृगजळापाठी आयुष्य पणाला लावलेले आहे...त्याचे वेड , त्याची मजबूरी...या निर्दय शहराने त्याची केलेली धूळधाण; त्याची कहाणी.  या शहराच्या बकालपणात रोजचा झगडा करणाऱ्या, संसाराच्या ओढगस्तीत पिचून गेलेल्या, मोलकरणीचे काम करणाऱ्या मंजुळाबाई - या रखरखाटात , एका सड्या , फ्लॅटमधील तरुणाशी घडलेला संग, त्या संगातही कळत-नकळत त्यांनी दिलेले वात्सल्याचे दान - त्या दानाची कहाणी. लग्नाचे वय उलटून गेलेल्या , शारीर सुखाच्या अनुभवानंतर , आशा-निराशेचा पूल ओलांडून झाल्यावर आपल्या साथीदाराच्या निवडीकडे  शहाणपणाने बघणाऱ्या पस्तीशीच्या मुलीला आलेल्या शहाणपणाची कहाणी. आणि अशा कितीतरी.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आणि ही दर्शने घडविताना मग  अनेक संकेतांचे बांध त्यांच्या लिखाणात मोडलेले दिसून येतात. पण "स्त्री-पुरुषांच्या लैंगिक संबंधांचे धीट चित्रण करणारी लेखिका" किंवा "स्त्रीवादी लेखिका" हे सर्व शिक्के त्यांच्याबाबतीत अपुरे, एकांगी आणि म्हणूनच अन्यायकारक आहेत. मायक्रोस्कोपखाली दिसणाऱ्या जंतुंकडे पहाताना ज्याप्रमाणे एखाद्या शास्त्रज्ञाकडे एक वस्तुनिष्ठ दृष्टिकोन असतो, त्याचप्रमाणे आयुष्याच्या सोसाट्याकडे, महापूरामध्ये साचून आलेल्या लव्हाळ्यांकडे पहाण्याचा लेखिकेचा दृष्टिकोन आहे. त्या दर्शनामध्ये ना फाजील गळेकाढूपणा , ना शारीर वासनांना कुरवाळणे. निसर्गाच्या न-नैतिकतेइतकेइतकीच लेखिकेच्या आविष्काराची न-नैतिकता. इथे इमान दिसते ते केवळ संकेतांना चिरत जाणाऱ्या सत्यान्वेषणाला.&lt;br /&gt;सत्याच्या शोधाची , त्याच्या दर्शनाची बंदिश घडते प्रतिमा-प्रतिकांनी, काव्यात्म संदर्भांनी. या लिखाणात ठायीठायी दिसणाऱ्या मराठी , इंग्रजी , उर्दू काव्याचे संदर्भ लिहिणाऱ्याच्या रसिकतेची खात्री देतात; सगळ्या आशयाला संपन्नता देतात. म्हणूनच , या लिखाणाला सलाम करताना गालिबच्या दोन ओळींनी समारोप करणे योग्य होईल : "नक्श फरीयादी है किसकी शोखी-ए-तेहेरीर का  काग़झी  है पैरहन हर पैकरे तस्वीर का"&lt;br /&gt;(आपला जन्म हेच जणू गाऱ्हाणे आहे. हे गाऱ्हाणे घेऊन जन्माला आलेले आपण सगळे कुणाच्या (परमेश्वराच्या ? नियतीच्या?) हातची खेळणी आहोत ? शेवटी काय , सगळ्या चित्रांना रूप घ्यावे लागते कागदी कपट्यांचेच !)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/2301518882851474855-3233207729142917974?l=muktasunit.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://muktasunit.blogspot.com/feeds/3233207729142917974/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=2301518882851474855&amp;postID=3233207729142917974' title='6 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2301518882851474855/posts/default/3233207729142917974'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2301518882851474855/posts/default/3233207729142917974'/><link rel='alternate' type='text/html' href='http://muktasunit.blogspot.com/2007/05/blog-post_24.html' title='काग़झी है पैरहन....'/><author><name>MuktaSunit</name><uri>http://www.blogger.com/profile/00445626723230179642</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://1.bp.blogspot.com/-vZSy_JeY3tg/Ti7ehA38n5I/AAAAAAAAA6U/xfdKbNO0nnk/s220/rajan.jpg'/></author><thr:total>6</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-2301518882851474855.post-8698899959991662283</id><published>2007-05-14T13:25:00.000-07:00</published><updated>2007-05-24T09:31:45.479-07:00</updated><title type='text'>शाश्वताचें प्रकाश-संश्लेषण : सूर्य पाहिलेला माणूस</title><content type='html'>कलेच्या व्यवहारात बहुशः समाजपुरुषाच्या रंजनाचे ब्रीद घेतलेल्या शिलेदारांची चलती असणे याचे, मला वाटते सर्वात मोठे प्रमाण अलिकडील मराठी रंगभूमीच्या स्थितीमध्ये सापडावे. तेंडुलकर , एलकुंचवार यांनी मांडलेले प्रश्न खरोखरच खूप मोठे होते. नाटकाच्या माध्यमातून, सामाजिक , राजकीय संदर्भातील जळजळीत प्रश्नांची धगधगती चित्रे आणि त्या संदर्भांच्या पलीकडची , माणसांबद्दलची  , माणसांच्या समूहांची तिसऱ्या डोळ्याने पाहिल्यासारखी दर्शने त्यानी घडवली. खानोलकरांसारख्या विचक्षण कलावंताने "आपुले मरण... " सारख्या रौद्र नाट्यातून माणसाच्या एका आदिम सत्याचा वेध घेतला...&lt;br /&gt;  "ते हि नो दिवसाः गताः" च्या या घडीला या अस्सल बावनकशी परम्परेशी नाते सांगणारे काही अलिकडेच पहायला मिळाले. अनेक वर्षानी हे जे नवल वर्तले, त्याबद्दल मजसारख्या लघुत्तम सामान्य वाचकाला जे जाणवले, ते जमेल तसे विशद करावे, म्हणून ही लेखनकामाठी.&lt;br /&gt;मकरंद साठे यांच्या  "सूर्य पाहिलेला माणूस" या नाटकाचा नाट्यपट पाहायचा योग अलिकडे आला. ग्रीक तत्ववेत्ता सॉक्रेटीस याची जीवनमूल्ये आणि त्या मूल्यांकरता त्याने स्वीकारलेले वीरमरण या सूत्रावर बेतलेल्या या नाटकाला अनेक पदर आहेत.&lt;br /&gt;नाटक सुरु होते ते ३ व्यक्तींच्या, काहीशा खमंग अशा संभाषणाने. या ३ व्यक्तीना , त्यांच्या संभाषणाला, कुठल्याही काळाचे , ठिकाणाचे संदर्भ नाहीत. त्यांच्या वरकरणी खटकेबाज अशा संवादांतून 'दिसायला' लागतात त्या,  ते represent करणाऱ्या प्रवृत्ती.. कुणी सिनिकल , तर कुणी भाबडा.. कुणी बेरकी , तर कुणी सरळ धारेचा.. कुणी विदुषकी व्यंगातून आयुष्याची वैयर्थता प्रकट करणारा , तर कुणी आपली बाजू हिरीरीने मांडणारा... आणि 'आपली बाजू' म्हणजे तरी कसली बाजू ? त्याला राजकीय , सामजिक असा कुठलाच संदर्भ नाही.. मात्र या प्रवेशातून , 'आंधळे आणि हत्ती' यांचे रूपक ठसविले जाते. आणि साऱ्या ज्ञानशाखा ज्या प्रश्नांकडे वळतात , त्या प्रश्नांच्या समेवर हा  प्रवेश येतो.. हे प्रश्न कुठले ? तर 'हे सारे काय आहे ?' , 'या साऱ्याचा अर्थ तरी काय ?' , 'सत्य म्हणजे काय ?' 'सत्याचे आणि आपले नाते काय ?' हे आणि असे प्रश्न.&lt;br /&gt;आणि 'सत्या'बद्दलच्या , या मूलभूत प्रश्नोपनिषदाला , अगदी अलगद अशी,एका प्रखर अशा प्रकाश-स्त्रोताची रूपकात्मकता नकळत मिळून जाते; आणि मग जाणवते: या साऱ्या 'बोलणाऱ्या माणसाना' संदर्भ आहे,तो प्लेटोच्या dialogues  मधील चिरंतन गुहांचा , त्यातील आदिम अंधारात चाचपडणाऱ्या , प्रकाशरूपी सत्याच्या शोधाचा.&lt;br /&gt;'सत्य म्हणजे काय ? त्याचे आपले नाते काय ? सत्यासारखी दाहक , अति-प्रखर गोष्ट कुणाला पेलवली आहे काय ?' अशा मालिकेतून , गोष्ट सुरू होते ती सत्यापासून न चळलेल्या , 'सूर्य पाहिलेल्या माणसाची' , सॉक्रेटिसची.&lt;br /&gt;तत्कालीन ग्रीक संस्कृतिचा  इतिहास हा अति-मर्यादित लोकशाही आणि दडपणारी राजसत्ता यांच्या रस्सीखेचेचा इतिहास आहे. अतिशय मर्यादित अशा वैचारिक  स्वातंत्र्याच्या या कालखंडात सॉक्रेटिस मात्र, अथेन्स मधील तरुणाना सतत आपल्या तत्त्वशोध पद्धतीने, सत्याचा मागोवा घेण्यास उद्युक्त करीत होता.  विद्यार्थी, मित्र, आणि अमीर-उमरावांच्या वर्गातील अनेक तरुण त्याच्या विचारानी प्रभावित होत होते. प्लेटोने ग्रंथित केलेल्या या सर्व संवादांमधून, 'श्रेयसा'च्या शोधाचे , ते प्राप्त करण्यासाठीच्या वाद-विवाद प्रधान अशा मंथनाचे दर्शन घडते.प्रत्येक गोष्टीला तार्किक , अति-कठोर अशा तात्विक भिंगाखाली घालण्यास तरुण पिढीस उद्युक्त करणार्क्ष्या या माणासामुळे लोकशाहीच्या बुरख्या-आडून निरंकुश सत्ता हाकू पाहणाऱ्या तत्कालीन राज्यकर्त्यांची झोप न उडती तर नवल. अथेन्सतर्फे त्याच्यावर रीतसर खटला भरण्यात आला. ग्रीक दैवतांची पायमल्ली आणि अथेन्सच्या युवकाना बहकवणे असे दुहेरी आरोप त्याच्यावर लादण्यात आले. प्लेटोने आपल्या ग्रन्थात या खटल्याचे सविस्तर चित्रण केले आहे. या खटल्याच्या दरम्यान आपल्या विरोधकांची केलेली उलट-तपासणी, त्यांच्या प्रत्येक आरोपाचे खंडन आदि भागातून सॉक्रेटिसची न्याय्य बाजू सिद्ध तर झालीच आहे; पण या खटल्याच्या अंती सॉक्रेटिसने केलेल्या निवेदनात त्याने आयुष्यभर केलेल्या तपश्चर्येचे जणू सारच एकवटले आहे.प्लेटो हा सॉक्रेटीसचा शिष्यवर.  ज्ञान हे डबक्यातल्या पाण्यासारखे स्थिर नसून , ती एक प्रवाही गोष्ट आहे, असली पाहिजे , वाद-विवादातूनच तत्वबोध होतो अशा आपल्या ठाम विश्वासांमुळे सॉक्रेटीसने लिहिलेले काहीही इतिहासाच्या दस्त-ऐवजामध्ये  सापडत नाही. प्लेटोने मात्र आपल्या Republic या , पाश्चात्य तत्त्वज्ञानातील अत्यंत महत्त्वाच्या गणल्या जाणाऱ्या ग्रन्थामध्ये  सॉक्रेटीसच्या विचारांचा , त्याच्या "वाद-संवादीय पद्धत्ती" (Dialectic Method)चा, उत्तम आलेख काढला आहे.&lt;br /&gt;नाटकाचा जो घटनाप्रधान , संवादप्रधान भाग आहे तो आहे सॉक्रेटीसच्या आयुष्यातील अंतिम पर्वाचा,त्याच्या हलाखीबद्दलचा,त्याच्यावरील खटल्याबद्दलचा. त्याला झालेल्या ; नव्हे, त्याने स्वीकारलेल्या शिक्षेचा. अर्थातच , हा सर्व भाग डॉ. श्रीराम लागू यानी रंगविलेल्या  सॉक्रेटीसच्या लखलखीत अशा परफॉर्मंस ने उजळून टाकला आहे.त्यांची आतापर्यंतची कारकीर्द म्हणजे एकाहून एक उंच अशी हिमशिखरे आहेत. 'नटसम्राट' , 'हिमालयाची सावली' , 'उध्वस्त धर्मशाळा' , 'एकच प्याला'... नावे तरी किती घ्यायची. पण , आपल्या कारकीर्दीच्या जवळ जवळ अखेरीस केलेल्या या भूमिकेने या सर्वांवर कळस चढला असे म्हण्टले तरी चूक होणार नाही. ख़्याल गायकीमध्ये असंख्य मैफ़ली गाजवून सोडलेल्या एख़ाद्या गवयाने , अगदी वृद्धापकाळी सुद्धा स्वरांची निराळी दुनिया दाखवावी , तसे लागूंनी अनुभवांचे नवे प्रदेश दाखविले आहेत अर्थात , लागूंचा हीरा बसवायला कोंदण हवे ते अस्सल संहितेचे.. त्याबद्दल बोलण्यासारखे प्रचंड आहेच. नवनवे प्रयोग करणाऱ्या समृद्ध अशा मराठी रंगभूमीवरसुद्धा अभिनव ठरेल असे हे , ज्ञानशाखांच्या गाभ्याला हात घालणारे शिव-धनुष्य होते.. ते उचलण्याचे धाडस करणाऱ्या मकरंद साठे या नाटककाराचे , अतुल पेठे या दिग्दर्शकाचे कौतुक करावे तेवढे थोडेच.&lt;br /&gt;इतके बोलून झाल्यवरसुद्धा, काही विचार मनात येतात ते बोलून दाखवल्याशिवाय राहावत नाही ... सॉक्रेटीसची , त्याच्या तत्वांबद्दलच्या लढ्याची बाजू पुरेशा ताकदीने मांडूनसुद्धा काही ताणांचा विलय झाल्यासारखे वाटत नाही. उदाहरणार्थ , सॉक्रेटीसची बायको झांटीप्पेची व्यथा पुरेशा पूर्णत्वाने उतरली नाहीसे वाटते.सत्याकरिता वीरमरण स्वीकारणे हे श्रेयास्पद खरेच. पण सत्याकरिता मरण,की सत्याच्या तडजोडीच्या छायेतील जीवन यातील  निवड ही heroic असली तरी व्यामिश्र आहे का?. सामान्य माणसाच्या आयुष्यात याहून अधिक जटील असे choices येतात आणि ते निवडण्याचे निकष असण्याइतपत  सॉक्रेटीस आपण नसतो. अशावेळी 'सत्य' , 'स्वातंत्र्य' या गोष्टींचे , कचकड्यासारखे अर्थ दिसायला लागतात ... झांटीप्पेचीची व्यथा अशा स्वरूपाची, कदाचित तशीच जटील असावी असे वाटते... साठे यांच्यासारख्यानी अशा जटील प्रश्नांचाही कधी वेध घ्यावा असे वाटून जाते...&lt;br /&gt;  असे हे , मराठी नाट्यभूमीचा नवीन माप-दंड ठरेल असे नाटक. आपल्या सर्वानी जरूर पहावेसे... आपल्या नाट्यविषयक, आणि वैचारिक facultiesना समृद्ध करणारे.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/2301518882851474855-8698899959991662283?l=muktasunit.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://muktasunit.blogspot.com/feeds/8698899959991662283/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=2301518882851474855&amp;postID=8698899959991662283' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2301518882851474855/posts/default/8698899959991662283'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/2301518882851474855/posts/default/8698899959991662283'/><link rel='alternate' type='text/html' href='http://muktasunit.blogspot.com/2007/05/blog-post.html' title='शाश्वताचें प्रकाश-संश्लेषण : सूर्य पाहिलेला माणूस'/><author><name>MuktaSunit</name><uri>http://www.blogger.com/profile/00445626723230179642</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://1.bp.blogspot.com/-vZSy_JeY3tg/Ti7ehA38n5I/AAAAAAAAA6U/xfdKbNO0nnk/s220/rajan.jpg'/></author><thr:total>2</thr:total></entry></feed>
